Loksabha 2019

Loksabha 2019 : भाजप म्हणजे 'भागती जनता पक्ष' : अखिलेश यादव

पीटीआय

लखनौ (पीटीआय) : भारतीय जनता पक्षाचा नवा अर्थ 'भागती जनता पक्ष' असल्याचे सांगत समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. पत्रकार परिषद आणि जेव्हा जेव्हा पत्रकार प्रश्‍न विचारतात त्यापासून पलायन करणारा पक्ष असे नव्याने वर्णन त्यांनी केले.

"तुम्ही काही नवे ऐकले आहे का, असे "विकास' विचारत आहे. लोकांनी भाजपचा नवा अर्थ "भागती जनता पक्ष' असा काढल्याचे ऐकिवात आले आहे. कारण पंतप्रधान पत्रकार परिषदेपासून पलायन करतात. त्यांचे नेते पत्रकारांच्या प्रश्‍नांपासून पळ काढतात आणि त्यांचे पक्ष कार्यकर्ते 15 लाख रुपये व रोजगार मागणाऱ्यांपासून पळतात,'' असे ट्विट अखिलेश यादव यांनी केले आहे. दुसऱ्या ट्विटमध्ये अखिलेश यांनी नोटाबंदीदरम्यान जन्म झालेल्या "खजांची' नावाच्या बाळाचे छायाचित्र टॅग करून "पंतप्रधान नरेंद्र मोदी जी तुम्ही या बालकाला ओळखले का?' असा सवाल केला आहे. याचे नाव खजांची आहे.

नोदाबंदीदरम्यान याचा बॅंकेत जन्म झाला. ज्यांनी त्याच्या आईला वेदना दिल्या, अशा पक्षाविरोधात मत देण्याचा हट्ट तो करू लागला आहे. आम्ही त्याला समजावले आहे की, तू अजून खूप लहान आहे आणि तसेही जो तुझ्याशी वाईट वागेल, त्याच्याशी वाईट वागणे ही चांगली गोष्ट नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Alert : महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा, 48 तास कोसळणार धो-धो पाऊस; दिवाळीपर्यंत पाऊस राहणार?

Latest Maharashtra News Updates : कुख्यात गुंड छोटा राजनचा जामीन सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द

Navratri festival: '६०० वर्षांपूर्वीचे दुर्मिळ अलंकार रुक्मिणी मातेला परिधान करणार'; पंढरपूर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी

Pune Grand Challenge : सायकल स्पर्धा; दर्जेदार रस्त्यांचे आव्हान, नोव्हेंबरपर्यंत कामे करावी लागणार पूर्ण; अटीशर्तींवरून आरोप

केरळमध्ये मेंदू खाणाऱ्या अमीबाचं थैमान, आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू; कसा होतो संसर्ग?

SCROLL FOR NEXT