Rahul Gandhi
Rahul Gandhi 
Loksabha 2019

काँग्रेसला घरच्यांचाच दणका! 2014 मध्ये मणिशंकर अय्यर.. आता पित्रोदा! 

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमध्ये घुसून केलेल्या हवाई हल्ल्यावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करणाऱ्या सॅम पित्रोदा यांच्यामुळे काँग्रेसला आज (शुक्रवार) 'बॅकफूट'वर जावे लागले. विशेष म्हणजे, मुंबईवर 26-11 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यासाठीही पाकिस्तानला जबाबदार धरता येणार नसल्याचे बेजबाबदार वक्तव्य करत पित्रोदा यांनी विरोधकांना 'फुलटॉस' दिला आणि सत्ताधारी भाजपने ही संधी लगेच साधली. 

'मुंबईमध्ये आठ जणांनी दहशतवादी हल्ला केला. त्यासाठी पाकिस्तानला जबाबदार कसे धरता येईल? त्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून लगेच लढाऊ विमाने पाठविणे चुकीचे होते. काही जणांच्या कृत्यामुळे संपूर्ण देशाला जबाबदार धरणे मला योग्य वाटत नाही', असे धक्कादायक विधान पित्रोदा यांनी केले. परदेशस्थ भारतीय काँग्रेसचे अध्यक्षपद पित्रोदा यांच्याकडे आहे. 

पित्रोदांच्या या वक्तव्यांमुळे भाजपला ऐन निवडणुकीत जोरदार मुद्दा मिळाला आहे. विशेष म्हणजे, गेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वीही काँग्रेसच्या मणिशंकर अय्यर यांनी मोदींसंदर्भात असेच बेताल वक्तव्य केले होते आणि त्याचा फटका काँग्रेसला निवडणुकीमध्ये बसला. 

'मी तुम्हाला वचन देतो.. की या एकविसाव्या शतकामध्ये नरेंद्र मोदी कधीच भारताचे पंतप्रधान होऊ शकत नाहीत. पण त्यांना इथे येऊन चहा विकायचा असेल, तर आम्ही त्यांना जागा नक्की देऊ', अशा शब्दांत अय्यर यांनी 2014 च्या निवडणुकीपूर्वी मोदी यांची खिल्ली उडविली होती. खुद्द मोदींसह भाजपच्या इतर नेत्यांनीही अय्यर यांच्या विधानाचा चांगलाच समाचार घेतला होता आणि निवडणुकीच्या प्रचारातही त्याचा पुरेपूर वापर झाला होता. 

या निवडणुकीनंतर काँग्रेसने अय्यर यांना बाजूला केले होते. आता पित्रोदा यांनी ऐन निवडणुकीत भाजपला आणखी एक मुद्दा पुरविल्याने आज सकाळपासून सोशल मीडियावर त्यांचा उल्लेख 'दुसरे मणिशंकर अय्यर' असाच केला जात आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT