Loksabha 2019

Loksabha 2019 : अमेठीत भाजपकडून पैसे वाटप : प्रियांका गांधी

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : अमेठी लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी निवडणूक लढवित आहेत. या मतदारसंघात भाजपकडून मतदारांना पैसे वाटप केले जात आहेत, असा गंभीर आरोप काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी आज (शनिवार) केला.  

2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपकडून केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांना अमेठीतून उमेदवारी देण्यात आली होती. त्यानंतर यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही स्मृती इराणी यांना राहुल गांधींविरोधात भाजपने मैदानात उतरवले आहे. त्यानंतर आता प्रियांका गांधी यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. यामध्ये प्रियांका गांधी म्हणाल्या, अमेठी लोकसभा मतदारसंघातील सरपंचांना भाजपकडून प्रत्येकी 20 हजार रुपये दिले जात आहे. 20 हजार रुपयांत सरपंच विकतील, असे भाजपवाल्यांना वाटत असतील तर हे हास्यास्पद आहे.

दरम्यान, अमेठी लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जात आहे. त्यामुळे आता ही जागा ताब्यात घेण्यासाठी भाजपकडून प्रयत्न केले जात आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari: ‘भूमिपुत्रांना रोजगार द्या, त्यांचं आयुष्य समृद्ध करा’; आ. अमोल मिटकरी यांची विधान परिषदेत ठाम मागणी

Manoj Kayande : अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या; आमदार मनोज कायंदे यांची अधिवेशनात मागणी

KDMC Revenue Department : कल्याण - डोंबिवली खाडी किनारी महसूल विभागाची कारवाई; 30 लाखांचा मुद्देमाल केला नष्ट

"मृत्युपत्र तयार ठेवलंय" एअर इंडियाने प्रवास करणाऱ्या अभिनेत्याची पोस्ट व्हायरल, म्हणाला..

Latest Maharashtra News Updates : सोमनाथच्या मृत्यू संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT