Loksabha 2019

Loksabha 2019 : लष्कर ही मोदींची मालमत्ता नाही : राहुल गांधी

पीटीआय

नवी दिल्ली : भाजपच्या आक्रमक राष्ट्रवादाला उत्तर देताना कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले. भारतीय लष्कर ही मोदींची खासगी मालमत्ता नसून, उलट भाजप दहशतवादाशी लढताना तडजोडी करीत आहे, असा आरोप राहुल यांनी केला. त्यासाठी राहुल यांनी वाजपेयींच्या काळात मसूद अजहरला सोडून दिल्याचा दाखला दिला.

राहुल गांधी यांनी आज पक्ष मुख्यालयात पत्रकार परिषद घेत भाजप आणि मोदींवर निशाणा साधला. "दहशतवाद ही अत्यंत मोठी समस्या असून, कॉंग्रेस पक्षच याबाबत अधिक कडक भूमिका घेऊ शकतो. भाजप मात्र मतांच्या राजकारणासाठी संरक्षण दलांचा वापर करीत आहे. "एनडीए'च्या पहिल्या सत्ताकाळातच मसूदला सोडून देण्यात आले होते. भाजपने राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड केली आहे. "यूपीए'च्या काळातील सर्जिकल स्ट्राइकला व्हिडिओ गेम असे हिणवून मोदींनी लष्कराचा अवमान केला आहे,' अशी टीका राहुल यांनी केली. 

पंतप्रधान मोदींनी काल (ता. 3) कॉंग्रेसवर टीका करताना "यूपीए'चे सर्जिकल स्ट्राइक्‍स कागदावरच असल्याचे म्हणत सर्जिकल स्ट्राइक म्हणजे व्हिडिओ गेम असल्यासारखे कॉंग्रेस नेत्यांना वाटत असल्याचे म्हटले होते. त्याला राहुल यांनी आज उत्तर दिले. "मसूदला पाकिस्तानात परत कोणी पाठविले?दहशतवाद्यांबरोबर चर्चा कोणी केली? त्यांच्यासमोर कोण झुकले? भाजपने दहशतवाद्यांबरोबर तडजोड केली. कॉंग्रेसने असे कधीही केले नाही,' असा दावा केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayush Komkar Case: आयुष कोमकर खून प्रकरणात कोर्टामध्ये काय घडलं? बंडू आंदेकरचे पोलिसांवरच आरोप

Pune Traffic Issue : वाहतूक अडथळ्यांच्या कारणांचा अहवाल सादर करा; आयुक्तांचा आदेश

Sachin Yadav: नीरजलाही मागे टाकणारा कोण आहे सचिन यादव? पोलिस भरतीनंतर भालाफेक सोडण्याचा केलेला विचार, पण...

Latest Maharashtra News Updates : प्राध्यापकाने केली विद्यार्थिनीची छेडखानी, तक्रार करुनही कारवाई नाही

Mamata Banerjee: ८४० कैदी तुरुंगातून मुक्त! विधानसभा निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जी यांचा निर्णय, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT