Loksabha 2019

Loksabha 2019 : विरोधकांना स्पष्ट बहुमत मिळेल : चंद्राबाबू

पीटीआय

कोलकाता : सर्वच विरोधी पक्षांचे नेते नरेंद्र मोदींपेक्षा चांगले आहेत. त्यामुळे निकालानंतर एकत्र बसून कोण पंतप्रधान होईल, याचा एकमताने निर्णय घेतला जाईल, असे सांगत तेलुगू देसम पक्षाचे प्रमुख एन. चंद्राबाबू नायडू यांनी विरोधकांना निवडणुकीत पूर्ण बहुमत मिळण्याचा विश्‍वास व्यक्त केला. 

चंद्राबाबू नायडू यांनी "पीटीआय'ला दिलेल्या मुलाखतीत निवडणुकीबाबतचे त्यांचे भाकीत व्यक्त केले. "मोदी सरकारबद्दल जनतेमध्ये नाराजी असल्याने त्याचा भाजपविरोधकांना फायदा होऊन त्यांना सत्ता मिळेल. भाजपच्या विरोधातील सर्वच पक्ष शक्तिमान असून, त्यांचे नेतेही सामर्थ्यशाली आहेत. ते मोदींहून अधिक चांगले आहेत. त्यामुळे विरोधकांपैकी पंतप्रधानपदासाठी कोण सर्वोत्तम आहे, याचा निर्णय निकालानंतर सार्वमताने केला जाईल,' असे नायडू म्हणाले. नायडू यांनी आपण स्वत: मात्र पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नसल्याचे स्पष्ट करत मी केवळ समन्वयक असल्याचे सांगितले. 

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत जनता अस्पष्ट कौल देणार नाही. कारण, सर्वच विरोधी पक्षांच्या बाजूने जनता असून भाजप ही निवडणूक हरणार असल्याचे स्पष्टपणे दिसत असल्याचा दावा नायडू यांनी मुलाखतीदरम्यान केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जीव दे म्हटलं म्हणून एखाद्याने खरंच जीवन संपवलं तर काय? हायकोर्टाची महत्त्वाची टिप्पणी

Instagram Algorithm : इन्स्टाग्रामच्या नियमांमध्ये मोठा बदल; ओरिजिनल कंटेंट होणार प्रमोट.. मात्र यूजर्सचं टेन्शन वाढणार!

Namrata Sambherao: "महाराष्ट्राची लाडकी नमा..."; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरनं नम्रता संभेरावला लिहिलं खास पत्र

Viral Video: खिशात खेळण्यातली पिस्तूल सापडल्यानंतर पकडले कान, मुंबई मेट्रो स्टेशन वरील चिमुकल्याचा व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : कुर्ल्यातील भाभा हॉस्पिटलमध्ये कामबंद आंदोलन

SCROLL FOR NEXT