Loksabha 2019

Loksabha 2019 : 'मला उमेदवारी द्या, काँग्रेस-राष्ट्रवादीचा पराभव करेन'

वृत्तसंस्था

मुंबई : ईशान्य मुंबईच्या जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. असे असताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आरपीआय) अध्यक्ष रामदास आठवले यांनी याबाबत वक्तव्य केले. ते म्हणाले, शिवसेना-भाजपने ईशान्य मुंबईतून मला उमेदवारी द्यावी. त्यांनी मला उमेदवारी दिल्यास काँग्रेस-राष्ट्रवादीचा पराभव करून दाखवेन.

ईशान्य मुंबईतील भाजपचे विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांच्या नावाला शिवसेनेने कडाडून विरोध केला आहे. येथील शिवसैनिकांनी वेळप्रसंगी भाजपविरोधात मतदान करण्याचे किंवा शिवसेनेचा उमेदवार देण्याची तयारी सुरु केल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळेच ईशान्य मुंबईतून कोणाला उमेदवारी मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातच आता आठवले यांनी हे वक्तव्य केले आहे. 

याबाबत आठवले म्हणाले, ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेना-भाजपमध्ये संघर्ष आहे. त्यामुळे हा मतदारसंघ रिपाइंला मिळाल्यास तेथून मी निवडणूक लढवेन. या मतदारसंघातील मतदार मला ओळखत असून, यापूर्वी मी ईशान्य मुंबईतून निवडणूक लढवली होती. तेव्हा मला 2 लाख 25 हजार मतं मिळाली होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT