महाराष्ट्र

जगातील 50 टक्के दम्याचे मृत्यू भारतात 

नेत्वा धुरी

मुंबई - वाढते वायुप्रदूषण आणि बांधकामांमुळे पसरणारे धूलिकण यामुळे जगभरात दम्याचे रुग्ण वाढत आहेत. जगात दम्यामुळे होणारे निम्मे मृत्यू भारतात होतात. दम्यामुळे भारतात गेल्या तीन वर्षांत दरवर्षी सरासरी दोन लाख 54 हजार जणांचा मृत्यू झाला. चुकीचे उपचार हे त्यामागील एक मुख्य कारण आहे. स्टिरॉईडचे प्रमाण जास्त असलेल्या औषधांमुळे मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याची माहिती "ग्लोबल बर्डन ऑफ डिसिजेस'च्या अहवालात देण्यात आली आहे. 

हा अहवाल लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल, असे या संस्थेच्या जुनाट श्‍वसनविकार विभागाचे (क्रॉनिक रेस्पिरेटरी डिसिजेस) प्रमुख डॉ. संदीप साळवी यांनी सांगितले. अस्थमाच्या रुग्णांसाठी इन्हेलरचा वापर महत्त्वाचा असतो; मात्र भारतात अस्थालिनच्या गोळ्या दिल्या जातात, असे या संस्थेने 2017 पासून केलेल्या पाहणीतून उघड झाले आहे. या गोळ्यांमुळे रुग्णाला 10 मिनिटांत आराम मिळतो. परंतु, गोळ्यांमधील स्टिरॉइडचे प्रमाण 20 पटींनी जास्त असल्यामुळे रुग्णाच्या शरीरावर घातक परिणाम होतात, अशी माहिती डॉ. साळवी यांनी दिली. 

स्टिरॉईडयुक्त औषधांमुळे रुग्णाच्या श्‍वासनलिकेतील सूज कमी होते. इन्हेलरमधून आवश्‍यक प्रमाणातच स्टिरॉईड दिले जाते. गोळ्यांमधून रुग्णाच्या शरीरात अतिरिक्त स्टिरॉईड जाते. त्यामुळे श्‍वासनलिकेतील सूज कमी होते; मात्र इतर अवयवांवर घातक परिणाम होतो, असे डॉ. साळवी यांनी सांगितले. उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयाचे ठोके आणि मेंदूच्या कार्यावर स्टिरॉईडच्या अतिरिक्त मात्रेचा घातक परिणाम झाल्याने रुग्णांचा मृत्यू होतो, अशी माहिती त्यांनी दिली. भारतातील दम्याच्या रुग्णांना स्टिरॉईडचे अतिरिक्त प्रमाण असेलल्या गोळ्या दिल्या जात असल्याबद्दल आंतरराष्ट्रीय पातळीवर टीका होत आहे असे ते म्हणाले. 

रुग्णांनी हे करावे 
- डॉक्‍टरांच्या सल्ल्यानुसार योग्य आहार घ्यावा. 
- अनुभवी व निष्णात डॉक्‍टरांकडूनच उपचार घ्यावे. 

मृत्यूची मुख्य कारणे 
- दम्याबाबतचे गैरसमज 
- चुकीच्या उपचारपद्धती 
- रुग्णांचे उपचारांकडे दुर्लक्ष 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

Sairat Complete 8 Years : मराठी सिनेमाला १०० कोटींचं स्वप्न दाखवणाऱ्या 'सैराट'ला ८ वर्षं पूर्ण; रिंकूची पोस्ट चर्चेत

Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांच्या उसळीसह बंद, गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update: कोणतेही काम करण्यापूर्वी मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थानी जातो: PM Modi

Nashik News : मालेगावी भाजीपाल्याची आवक स्थिर! मे, जून महिन्यात उत्पादन घटण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT