महाराष्ट्र बातम्या

वंचितची ताकद वाढणार; आणखी एक मोठा पक्ष सोबत येणार

वृत्तसंस्था

मुंबई : लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने राज्यात आपली ताकद दाखवली होती. प्रकाश आंबेडकर आणि हैदराबादच्या ओवैसी बंधू यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीने आता विधानसभा निवडणुकांसाठीही कंबर कसली आहे. सोबतच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे ठरविले असून ते वंचित बहुजन आघाडीसोबत जाण्याची शक्यता असल्याने वंचितची ताकद वाढणार असल्याचे दिसत आहे.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीने महाराष्ट्रातील सर्व 48 जागा लढविल्या होत्या. त्यात आलेल्या दारुण अपयशानंतर राज्यातील कोणत्याही निवडणुका आम आदमी पक्षाने लढविल्या नव्हत्या. राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुका लढवण्याचा आम आदमी पक्षाने निर्णय घेतला असून, वंचित बहुजन आघाडीशी युती करुन निवडणुकीत काही ठिकाणी उमेदवार देण्याचा आम आदमी पक्षाचा विचार आहे.

वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस यांच्यात आघाडी होण्याची शक्यता तूर्तास मावळली असल्यानेच आम आदमी पक्षाचा वंचित बहुजन आघाडीसोबत जाण्याचा इरादा असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. आम आदमी पक्षाचे राज्यातील नेते हे ब्रिगेडीअर सुधीर सावंत आहेत असून आता ते पुढील भूमिका काय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Alert : महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा, 48 तास कोसळणार धो-धो पाऊस; दिवाळीपर्यंत पाऊस राहणार?

Latest Maharashtra News Updates : सामान्यांची एकीची वीण उसवू नये- शरद पवार

Navratri festival: '६०० वर्षांपूर्वीचे दुर्मिळ अलंकार रुक्मिणी मातेला परिधान करणार'; पंढरपूर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी

Pune Grand Challenge : सायकल स्पर्धा; दर्जेदार रस्त्यांचे आव्हान, नोव्हेंबरपर्यंत कामे करावी लागणार पूर्ण; अटीशर्तींवरून आरोप

केरळमध्ये मेंदू खाणाऱ्या अमीबाचं थैमान, आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू; कसा होतो संसर्ग?

SCROLL FOR NEXT