Accidental death of twelve hundred students in the state during the year.jpg
Accidental death of twelve hundred students in the state during the year.jpg 
महाराष्ट्र

राज्यात वर्षभरात बाराशे विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

पुणे : गेल्या वर्षभरात राज्यात 1 हजार 190 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. यामध्ये सर्वाधिक अपघाती मृत्यू हे पाण्यात बुडून आणि संर्पदंशाने मृत्यू झाले आहेत. त्यांना राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह योजनेतून मदत दिली आहे. दरम्यान, दिवाळीनंतर बुधवारपासून (ता. 13) राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू होत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी, असे आवाहन प्राथमिक शिक्षण विभागाने केले आहे.

एकीकडे शहरांचा विकास होत आहे, तर दुसरीकडे रस्ते अपघात मोठ्या प्रमाणात होत आहेत. अनेकदा शाळकरी मुलांचा मृत्यू होतो, तर काहीजण जायबंदी होतात; तसेच नैसर्गिक आपत्ती, सर्पदंश, पाण्यात बुडून मृत्यू ही, मृत्यूची कारणे आहेत. अशा घटनांमध्ये विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी राज्य सरकारने 2011 मध्ये राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह योजना सुरू केली.

यंदा सरासरीपेक्षा पाऊस झाल्याने नद्या, नाले, विहिरी, तलाव, धरणे तुंडुब भरली आहेत. यात बुडून विद्यार्थ्यांचा मृत्यू होतो. तीन दिवसांसापूर्वी पुणे विभागातील सर्व शिक्षणाधिकारी व गटविकास अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या अपघाती मृत्यूवर चर्चा झाली. त्यामध्ये जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन हे अपघात कमी करण्यासाठी कोणती सावधगिरी बाळगावी, याबाबत पालकांचे प्रबोधन करावे, अशा सूचना सर्व अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

2017-18 मध्ये योजनेअंतर्गत 1 हजार 69 विद्यार्थ्यांना आर्थिक मदत केली होती; तर 2018-19 मध्ये 1 हजार 190 विद्यार्थ्यांना मदत दिली आहे. विद्यार्थ्यांच्या अपघाती मृत्यूस 75 हजार, दोन अवयव निकामी झाल्यास 50 हजार; तर एक अवयव निकामी झाल्यास 30 हजार रुपये मदत दिली जाते, असे प्राथमिक शिक्षण सहसंचालक दिनकर टेमकर यांनी सांगितले.

पुढील काळजी घ्या
- पाणवठ्यांकडे जाण्यास मुलांना रोखा
- पालकांमध्ये जनजागृती करा
- सर्पदंश टाळण्यासाठी शाळेचा परिसर स्वच्छ करा
- मदतीसाठी सरकारी रुग्णालयातून उपचार घ्या 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नेत्याचे एका दिवसात दोन पक्षप्रवेश, आधी शिंदे गटात मग ठाकरे गटात; काय आहे प्रकरण?

Poha Idali: सकाळच्या नाश्त्यात बनवा चवदार पोहा इडली, जाणून घ्या रेसिपी

Yogi Adityanath : जगाला शांतता संदेश देणाऱ्या सनातन परंपरेचा काँग्रेसनं अपमान केलाय, त्याचं अस्तित्व नाकारलंय; योगींचा घणाघात

Daily Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 02 मे 2024

Latest Marathi News Live Update : पुढील 24 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT