महाराष्ट्र

Loksabha 2019 : ठाकरे सक्रिय राजकारणात? 'या' मतदारसंघाची निवड

सकाळन्यूजनेटवर्क

लोकसभा 2019 : मुंबई- युवासेनेचे अध्यक्ष व शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे हे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. आदित्य हे मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शकत्या असून या मतदारसंघात भाजपच्या पूनम महाजन विद्यमान खासदार आहेत. ही जागा आदित्य यांच्यासाठी अधिक सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत असून शिवसैनिकांचीही अदित्य यांनी जनतेतून निवडणुक लढवावी ही इच्छा आहे.

त्याचबरोबर उत्तर-पश्चिमम मुंबई मतदार संघाचाही विचार चालू असल्याचे बोलले जात आहे. सध्या शिवसेनेचे गजानन कीर्तिकर विद्यमान खासदार आहेत. निवडणुकीच्या राजकारणापासून मी स्वत:ला कधीही दूर ठेवलेले नाही. गरज असेल तेव्हा मी लढेन. लोकप्रतिनिधी म्हणून मोठे काम करता येऊ शकते. माझे आजोबा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे वा माझे वडील उद्धव ठाकरे यांनी कधीही निवडणूक लढविली नाही पण, त्यांनी कुटुंबातील इतरांवर ते मत कधीही लादलेले नव्हते, असे आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले होते. 

आदित्य यांनी आजवर कोणतीही राजकीय निवडणूक लढविली नसली तरी, मुंबई जिल्हा फुटबॉल असोशिएशनच्या अध्यक्षपदी ते निवडून आले आहेत, त्यामुळे लोकसभेची निवडणुक लढवण्याची त्यांची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, याबाबत शिवसेनेकडून कुठल्याही प्रकारचे अधिकृत वृत्त आलेले नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chitra Wagh: ठाकरे गटाच्या जाहिरातीमध्ये पॉर्नस्टारचा वापर? चित्रा वाघ यांनी फोटो दाखवत केले गंभीर आरोप

Mahesh Manjrekar : स्वातंत्र्य वीर सावरकर, रणदीपचा हस्तक्षेप आणि मतभेद ; मांजरेकरांनी अखेर सोडलं मौन

Zimbabwe: झिम्बाब्वेने तयार केलं नवं चलन; पण सरकारी खात्यांमध्येच चालेनात नोटा, जनताही नाराज, काय आहे कारण?

T20 World Cup Team India: टी-20 वर्ल्ड कपचे शेर IPL मध्ये ढेर, संघात स्थान मिळताच 'हे' 6 भारतीय खेळाडू ठरलं फ्लॉप

Tech Layoffs : यंदाचं वर्ष ठरतंय 'लेऑफ'चं.. एप्रिलपर्यंत टॉप टेक कंपन्यांनी 70,000 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना पाठवलं घरी!

SCROLL FOR NEXT