Ajit Pawar Esakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar: मलिक आता कुठे बसणार? फडणवीसांनी लिहलेल्या 'त्या' पत्रावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

फडणवीसांनी लिहलेल्या नवाब मलिकांसंबधीच्या पत्रावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

गुरुवारी सभागृहाचं कामकाज सुरु झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक सत्ताधारी पक्षाच्या बाकावर सर्वात शेवटी बसले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर नवाब मलिक यांनी कोणालाही पाठिंबा जाहीर केलेला नव्हता. त्यांनी तटस्थ भूमिका जाहीर केली होती. त्यानंतर मलिक जामीनावर बाहेर आल्यानंतर दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी त्यांची भेट घेतली होती. मात्र आता नवाब मलिक यांनी अजित पवार गटाला पाठिंबा दिल्याचं स्पष्ट होत होतं.

त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना एक पत्र लिहून नवाब मलिक यांच्याबाबत नाराजी बोलून दाखवली आहे. सत्ता येते जाते परंतु मलिकांना महायुतीमध्ये घेणं योग्य ठरणार नाही, अशी भूमिका फडणवीसांनी घेतली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लिहलेल्या मलिकांसंबधीच्या पत्रावर अजित पवारांनी आज माध्यमांशी बोलताना पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवार काय म्हणालेत?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लिहलेलं पत्र मला मिळालं आहे. ते मी वाचलं आहे. नवाब मलिक हे काल पहिल्यांदांच सभागृहात आले होते. आम्ही महायुती सरकारसोबत गेल्यानंतर ते पहिल्यांदाच बाहेर आहेत. अद्याप त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं नाही. त्यांनी मत आणि भूमिका स्पष्ट केल्यानंतर मी माझी आणि पक्षाची भूमिका स्पष्ट करेन', असं अजित पवार म्हणालेत.

'त्या पत्रावर जो काही निर्णय घ्यायचा आहे, तो निर्णय मी घेईन. विधानसभेत कुणी कुठल्या बाकावर बसायचं हा अधिकार फक्त विधानसभा अध्यक्षांनाच आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रावर नवाब मलिकांची भूमिका काय? ते ऐकल्यानंतर मी याबाबत निर्णय घेणार आहे', असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

देवेंद्र फडणवीसांचं पत्र जशास-तसं

----------------

प्रति,

श्री. अजितदादा पवार,

उपमुख्यमंत्री महाराष्ट्र तथा अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

सस्नेह नमस्कार,

माजी मंत्री आणि विधानसभा सदस्य श्री. नवाब मलिक हे आज विधिमंडळ परिसरात येऊन कामकाजात सहभागी झाले होते. विधानसभा सदस्य म्हणून त्यांचा तो अधिकार सुद्धा आहे. त्यांच्याबाबत आमची वैयक्तिक शत्रुता अथवा आकस अजिबात नाही, हे मी प्रारंभीच स्पष्ट करतो.

परंतू, ज्या पद्धतीचे आरोप त्यांच्यावर आहेत, ते पाहता, त्यांना महायुतीमध्ये घेणे योग्य ठरणार नाही, असे आमचे मत आहे. सत्ता येते आणि जाते. पण सत्तेपेक्षा देश महत्वाचा आहे. सध्या ते केवळ वैद्यकीय आधारावर जामीन मिळाल्याने बाहेर आहेते. त्यांच्यावरील आरोप सिद्ध न झाल्यास आपण त्यांचे जरूर स्वागत करावे. मात्र अशाप्रकारचे आरोप असताना त्यांना महायुतीचा भाग करणे, हे योग्य होणार नाही, असे आमचे स्पष्ट मत आहे. आपल्या पक्षात कोणाला घ्यायचे, हा सर्वस्वी आपला अधिकार आहे, हे मान्यच आहे. परंतु, त्यामुळे महायुतीला बाधा पोहोचणार नाही, याचा विचारही प्रत्येक घटक पक्षाला करावाच लागत असतो, त्यामुळे आमचा या गोष्टीला विरोध आहे.

त्यांना देशद्रोह्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक झाली तरी त्यांना मंत्रिपदावर कायम ठेवणा-या तत्कालिन मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारच्या विचारांशी आम्ही सहमती दाखवू शकणार नाही. आपण आमच्या भावनांची नोंद घ्याल, अशी मला आशा आहे.

आपला,

देवेंद्र फडणवीस

राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी काय घडलं?

राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आज सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वादाची ठिणगी पडली. त्याला कारण ठरली माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांची सत्ताधारी बाकावरील उपस्थिती. ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी हा मुद्दा उपस्थित करताना तुम्ही देशद्रोह्याच्या मांडीला मांडी लावून बसू शकत नाहीत, असा घणाघात केला. त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आम्ही कोणाच्याही मांडीला मांडी लावून बसलेलो नाहीत, असे सांगितले.

दुसरीकडे मलिकांच्या एंट्रीमुळे महायुतीतच वाद सुरू झाले आहेत, फडणवीस यांनी आज थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहिले असून, मलिकांवर आरोप असताना त्यांना महायुतीमध्ये घेणे योग्य होणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. फडणवीस यांच्या या भूमिकेचे शिंदे गटानेही समर्थन केले आहे.

नवाब मलिक यांच्यावर आरोप काय आहेत?

कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमशी संबंधित सलीम पटेल आणि हसीना पारकर यांच्या गोवावाला कंपाउंड जमीन व्यवहारात अपहार केल्याचा आरोप नवाब मलिक यांच्यावर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT