बाळासाहेब थोरात
बाळासाहेब थोरात e sakal
महाराष्ट्र

निलंबित आमदारांबाबत बैठकीत चर्चा नाही

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : विधीमंडळात गोंधळ घातलेल्या आणि निलंबित झालेल्या भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन मागे घेण्याची निव्वळ चर्चा असल्याचे स्पष्ट झाले आहे. या आमदारांबाबत साधी चर्चाही झालेली नाही, तेव्हा निलंबन रद्द करण्याचा प्रश्न कोठून आला, असा सवाल काँग्रेस नेते, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित केला. परिणामी, भाजपच्या गोंधळी आमदारांना दिलासा मिळणार नाही.

राज्यसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन रद्द होण्याची चर्चा रंगली आहे. दरम्यान, या निवडणुकीतून भाजप माघार घेण्याच्या मोबदल्यात आपल्या आमदारांवरील कारवाईचा समझोता होऊ शकतो, याचाही अंदाज बांधला जात आहे. मात्र, तशी कोणतीच चर्चा आणि कार्यवाही होणार नसल्याचे सांगण्यात आले. थोरात म्हणाले, ‘‘राज्यसभेची पोटनिवडणूक होऊ नये, याकरिता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना भेटल्याने शिवसेना नाराज होणार नाही. तसे काही कारणही नाही. उलटपक्षी आम्ही एकत्र येऊन ही निवडणूक लढत आहोत. महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येणार, याची खात्री आहेच, पण राज्यात अशा

निवडणुका बिनविरोधी करण्याच्या परंपरेचा भाग म्हणून आम्ही फडणवीस यांची भेट घेतली. सगळ्यांच्या सोयीसाठी आणि प्रत्येकाला संधी मिळावी, यासाठी नवी प्रभाग पद्धत करीत आहोत. आम्हाला जे फायदे होतील, तेच विरोधकांनाही मिळतील. काही शहरांत प्रभागरचना मोठी असल्याचे त्यात बदल करण्याचा निर्णय झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : अर्शदीपचा अप्रतिम यॉर्कर अन् रहाणे झाला बाद

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

South India Travel : उन्हाळ्यातही करू शकता दक्षिण भारताची सफर; जाणून घ्या 'ही' थंड हवेची ठिकाणं

SCROLL FOR NEXT