Rahul gandhi Sakal
महाराष्ट्र बातम्या

ही यात्रा कोणीही रोखू शकत नाही - राहुल गांधी

खासदार गांधी यांनी सहा मिनिटात केलेल्या भाषणात अनेक मुद्द्यांना स्पर्श केला. ते म्हणाले, यात्रेचे लक्ष्य भारत जोडायचे आहे. द्वेष, क्रोध आणि हिंसा याविरोधात आवाज उठवायचा आहे.

सकाळ वृत्तसेवा

खासदार गांधी यांनी सहा मिनिटात केलेल्या भाषणात अनेक मुद्द्यांना स्पर्श केला. ते म्हणाले, यात्रेचे लक्ष्य भारत जोडायचे आहे. द्वेष, क्रोध आणि हिंसा याविरोधात आवाज उठवायचा आहे.

देगलूर - भारत जोडो यात्रा दोन महिन्यांपूर्वी कन्याकुमारी मधून सुरु केली. ती श्रीनगरमध्ये जाऊन थांबेल. त्याच्या अगोदर ही यात्रा कुठलीही शक्ती थांबवू शकत नाही. कितीही वादळे, संकटे येऊदेत, इथे जसा तिरंगा फडकला तसा श्रीनगरमध्येही फडकेल, असा विश्वास कॉंग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी व्यक्त केला.

अखिल भारतीय कॉंग्रेस समिती तर्फे देशातील वाढती महागाई, बेरोजगारी, जातीयता, इत्यादी प्रश्नांना ऐरणीवर मांडत राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेली भारत जोडो पदयात्रा आज (ता. ७) ६१ व्या दिवशी रात्री साडेनऊ वाजता देगलूरमध्ये पोहचली. तेलंगणातून महाराष्ट्रात यात्रेचा प्रवेश झाल्यानंतर पहिली सभा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या देगलूर येथील अश्वारुढ पुतळ्याला व इतर महापुरुषांना वंदन करुन सुरु झाली. तब्बल चार तासांपासून अधिक वेळ प्रतिक्षेत असलेल्या देगलूरकरांनी प्रचंड उत्साहात आणि जल्लोषात राहुल गांधींचे स्वागत केले.

खासदार गांधी यांनी सहा मिनिटात केलेल्या भाषणात अनेक मुद्द्यांना स्पर्श केला. ते म्हणाले, यात्रेचे लक्ष्य भारत जोडायचे आहे. द्वेष, क्रोध आणि हिंसा याविरोधात आवाज उठवायचा आहे. यात्रेत शेतकरी, व्यापारी जे भेटतील, त्यांच्यासाठी माझे हृदय खुले आहे. चुकीचा जीएसटी आणि नोटबंदीने त्यांचे कंबरडे मोडले आहे. एका बाजूला बेरोजगारी तर, दुसऱ्या बाजूला महागाई आहे. ३६० रुपयांचा सिलेंडर ११०० रुपयांवर गेला. डिझेल १०० रुपयांवर गेले आहे.

सुरवातीला राहुल गांधी यांचे पाच सुवासिनींनी ओवाळत स्वागत केले. त्यानंतर ते

१५ दिवस महाराष्ट्राचे दुःख ऐकू

महाराष्ट्रात आज प्रवेश केलाय. पुढच्या १५ दिवसात एकच लक्ष्य आहे. या काळात महाराष्ट्राचे दुःख ऐकायचे आहे. यात्रेत रोज सहा-सात तास लोकांचे ऐकतो आणि रात्री १०-१५ मिनिटे तेच म्हणणे मी पुन्हा लोकांसमोर मांडतो. असं राहुल गांधी म्हणाले.

लोकांच्यासाठी भावनिक क्षण

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ पोचताच व्यासपीठावर तेलंगणा कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष रेवंत कुमार यांनी महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे तिरंगा सुपुर्द केला. यावेळी राहुल गांधी यांनी तेलंगणाच्या पदाधिकाऱ्यांना 'जादू की झप्पी' दिली. ते भाषणाला उभारताच, "छत्रपती शिवाजी महाराज की जय.." या जयघोषाने सुरवात केली. भाषण संपल्यानंतरही राहुल गांधी यांनी बराच वेळ महाराजांच्या पुतळ्याचे अवलोकन केले. त्यानंतर ही मशाल यात्रा सभा स्थळावरुन वन्नाळीतील यादगार साहीबझादे बाबा जोरावरसिंघजी बाबा फतेहसिंघजी गुरुद्वाराकडे रवाना झाली. तिथे रात्री बारा वाजता गुरुनानक जयंतीनिमित्त अरदास करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China criticizes US: भारताची बाजू घेत चीनने पुन्हा एकदा अमेरिकेवर केली उघडपणे टीका, म्हटले...

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT