mantralay sakal
महाराष्ट्र बातम्या

मोठी बातमी! अधिवेशनातच होणार शेतकरी कर्जमाफीची घोषणा; थकबाकीमुळे २५ लाख शेतकऱ्यांसाठी बॅंकांचे दरवाजे बंद, कशी असणार कर्जमाफी, वाचा...

राज्यातील २५ लाख शेतकऱ्यांकडे सद्य:स्थितीत बॅंकांचे ३५ हजार ५०० कोटी रुपये थकले आहेत. अडचणीतील शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन त्यांच्या डोक्यावरील कर्जाचा भार कमी केला जाणार आहे. कर्जमाफी व दीर्घकालीन उपाययोजनांची घोषणा राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातच होईल, अशी माहिती सहकार विभागातील सूत्रांनी दिली.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : राज्यातील २५ लाख शेतकऱ्यांकडे सद्य:स्थितीत बॅंकांचे ३५ हजार ५०० कोटी रुपये थकले आहेत. अडचणीतील शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन त्यांच्या डोक्यावरील कर्जाचा भार कमी केला जाणार आहे. कर्जमाफी व दीर्घकालीन उपाययोजनांची घोषणा राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातच होईल, अशी माहिती सहकार विभागातील सूत्रांनी दिली. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थकबाकीदार व नियमित कर्जदार शेतकऱ्यांची माहिती सहकार विभागाकडून मागविली आहे.

राज्यात मागील पाच वर्षांपासून दररोज सरासरी सात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असल्याचे मदत व पुनर्वसन विभागाच्या अहवालात नमूद आहे. अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर, पुणे या विभागात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या आहेत. नापिकी, पिकांना हमीभाव नाही, अतिवृष्टी, महापूर व दुष्काळामुळे थकबाकीत गेलेल्या २५ लाख शेतकऱ्यांसाठी बॅंकांचे दरवाजे कायमचे बंद झाले आहेत. या पार्श्वभूमीवर दीर्घकालीन उपाययोजना केल्या जाणार असून, त्यासाठी माजी सनदी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. मार्चअखेर समितीचा अहवाल राज्य शासनाला सादर होईल. तत्पूर्वी, शेतकऱ्यांना राज्य सरकार कर्जमाफीतून मोठा दिलासा देणार आहे. पण, थकबाकीची रक्कम पाहता सातबारा कोरा होणार नाही हे निश्चित मानले जात आहे.

‘सहकार’मधील वरिष्ठ अधिकारी म्हणाले

राज्यातील जिल्हा मध्यवर्ती बॅंकांसह खासगी व राष्ट्रीयीकृत बॅंकांकडील ३० जून व ३० सप्टेंबर २०२५ या काळातील थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती मागविण्यात आली आहे. पाच जिल्हा बॅंकांसह काही खासगी बॅंकांकडील माहिती यायची राहिली असून पुढील चार-पाच दिवसांत सर्व माहिती प्राप्त होईल. त्यानंतर एकत्रित माहिती शासनाला सादर होईल. त्यानंतर मंत्रिमंडळात निर्णय होऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषद घेऊन निर्णय जाहीर करतील, असे सहकार विभागातील वरिष्ठ सूत्रांनी ‘सकाळ’ला सांगितले.

अशी असू शकते कर्जमाफी

  • शेतकऱ्यांचे तीन लाखांपर्यंतचे थकीत पीक कर्ज माफ; बाकीचे कर्ज फेडीसाठी मुदत

  • पाच वर्षांतील नियमित कर्जदारांना ५० हजार ते एक लाखांचे प्रोत्साहनपर अनुदान

  • ‘एकरकमी परतफेड योजने’तून कर्जमाफी घेणाऱ्या शेतकऱ्यांना पुन्हा नव्याने कर्ज

शेतकऱ्यांकडील थकबाकी

  • एकूण शेतकरी

  • १,३३,४४,२०९

  • थकबाकीतील शेतकरी

  • २४,७३,५६६

  • शेतकऱ्यांकडील एकूण थकबाकी

  • ३५,४७७ कोटी

मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात होईल निर्णय

भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय होता. सध्या बॅंकांकडून शेतकऱ्यांकडील पीककर्ज, अल्प, मध्यम व दीर्घ मुदतीच्या कर्जाची माहिती संकलित केली जात आहे. प्रवीणसिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखालील समितीचा अहवाल एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात येईल. त्यानुसार ३० जूनपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल. तत्पूर्वी, अधिवेशनात मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री त्यासंदर्भातील माहिती देतील.

- दत्तात्रय भरणे, कृषिमंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

६५ वर्षांनंतरही सोलापूरकरांच्या नशिबी प्रतीक्षाच! २५० कोटींत अडकले शासकीय अभियांत्रिकी कॉलेज; मंत्रिमंडळ व वित्त विभागाच्या मान्यतेसाठी प्रस्ताव

Mumbai fraud: मुंबईमध्ये बनावट कागदपत्रांद्वारे २०० कोटींचा अपहार; महावितरण अधिकारी, कंपन्यांविरुद्ध गुन्हे!

Emotional Student Story:अश्रू आवरत तिने दिली बारावीची परीक्षा; वडिलांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारानंतर गाठले परीक्षा केंद्र, कुटुंबावर दु:खाचा डोंगर!

India Semi Final Scenario: भारताला आता फक्त विजय पुरेसे नाही; उपांत्य फेरीसाठीचे गणित पूर्णपणे बदलले

T20 WC, IND vs SA: W,0,W,1,1,W; हार्दिक, रिंकू , अर्शदीप... एकाच षटकात सेम टू सेम OUT! केशव महाराजने ६ चेंडूत फिरवली मॅच

SCROLL FOR NEXT