महाराष्ट्र

Bird Flu: 'बर्ड फ्लु'चा चिकन उद्योगावर परिणाम नाही

मिलिंद तांबे

मुंबई: देशातील चार राज्यात पसरलेल्या 'बर्ड फ्लु'चा चिकन महाराष्ट्रातील चिकन उद्योगावर काहीही परिणाम झाला नसल्याचे पशु वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ अजित रानडे यांनी सांगितले. मुंबईसह राज्यातील चिकन उद्योग नियमित सुरू असून इतर राज्यातून चिकनला असलेली मागणी कायम असल्याचे ही त्यांनी नमूद केले.

हरियाणा, केरळ, मध्य प्रदेश आणि हिमाचल प्रदेश मध्ये पक्ष्यांवरील 'बर्ड फ्लु' आजाराने थैमान घातले आहे. गेल्या आठवड्याभरापासून याबाबतच्या उलट सुलट चर्चा सुरु असून याचा राज्यातील चिकन उद्योगावर परिणाम होण्याची होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र राज्यातील चिकन उद्योगावर याचा काहीही परिणाम झाला नसल्याचे ही डॉ रानडे यांनी सांगितले. 

'बर्ड फ्लु' हा आजार पक्षांमधून माणसांना होत नाही. त्यामुळे घाबरण्याचे कारण नसल्याचे ही डॉ रानडे यांनी सांगितले. आपल्याला हा आजार नवीन नाही त्यामुळे त्याचा सामना कसा करायचा हे माहित आहे, शिवाय आपल्याकडे अधिक स्वछता तसेच सरकारने घालून दिलेल्या निर्देशांचे पालन करण्यात येत असल्याचे ही ते पुढे म्हणाले.

इतर राज्यात पसरलेल्या 'बर्ड फ्लु'मुळे महाराष्ट्रातील चिकनची मागणी वाढली आहे. महाराष्ट्रातून गुजरात आणि मध्य प्रदेश या राज्यांना मोठ्या प्रमाणावर चिकन पुरवले जात असून ही मागणी 300 टनावर गेली असल्याचे व्यंकेटश्वरा हॅचरीजचे महाव्यवस्थापक डॉ. प्रसन्न पेडगावकर यांनी सांगितले.

राज्यात दररोज 1700 ते 1800 टन चिकनचा पुरवठा होतो. तर मुंबईत 1000 ते 1200 टन चिकन फस्त होते. यावर अद्याप कोणताही परिणाम झालेला नाही. 'बर्ड फ्लु' आजाराबाबत लोकांमध्ये जनजागृती असून हा आजार आपल्याकडे आला नसल्याचे लोकांना माहित आहे. त्यामुळे राज्यातील चिकन उद्योगावर काहीही परिणाम झाला नसल्याचे ही पेडगावकर यांनी सांगितले.

-----------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Bird flu has no effect on chicken industry in Maharashtra

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT