BJP
BJP 
महाराष्ट्र

भाजपमध्ये 'एकला चलो रे'ला बळ; दीडशे जागांचा सर्वेक्षणात अंदाज

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने प्रलंबित पडलेला मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्‍न सोडविला आहे. त्याचा राजकीय फायदा भाजपला मिळणार असून, सुमारे पाच टक्‍के इतकी मते पक्षाकडे झुकली आहेत. विधानसभा निवडणुकीत स्वबळावर 150 पेक्षा जास्त जागा भाजपला मिळणार आहेत, असे पक्षाने केलेल्या सर्वेक्षणात समोर आले आहे. यामुळे शिवसेनेबरोबरची युती तोडून 2014 प्रमाणे दोन्ही पक्षांनी वेगवेगळे लढावे, यासाठी भाजपमधील एक गट सक्रिय झाला असल्याचे सूत्रांकडून समजते.

मागील लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना आणि इतर घटकपक्ष महायुतीच्या झेंड्याखाली लढले होते. त्याआधी भाजपने चर्चेचे गुऱ्हाळ शेवटपर्यंत लांबवत ऐनवेळी शिवसेनेबरोबरील युती तोडून स्वबळावर विधानसभा निवडणूक लढवली होती. याचा लाभ भाजपला त्या वेळी झाला आणि 123 जागा मिळवत भाजपने राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सत्ता स्थापन केली. याचप्रमाणे 2019 च्या विधानसभा निवडणुकीतदेखील भाजपने स्वबळावर लढावे. मागील खेपेस तयारी नसताना राज्यात भाजपचे सर्वाधिक 123 आमदार निवडून आले.

या वेळेस केंद्रात पुन्हा भाजपचे सरकार विक्रमी जागा जिंकून दुसऱ्यांदा विराजमान झाले आहे. तर, राज्यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी पाच वर्षांचा कालावधी पूर्ण केला असून, मराठा समाजाच्या आरक्षणाचा कळीचा मुद्दा सोडविला आहे. यामुळे भाजपच्या मतात पाच टक्‍के इतकी वाढ होऊ शकते, अशी माहिती सर्वेक्षणातून पुढे आली आहे. याच आधारे राज्यात भाजपने सर्व 288 जागा स्वबळावर लढविल्या, तर नक्‍कीच 150 पेक्षा जास्त जागा जिंकून येण्याची खात्री भाजपमधील काही धुरिणांना वाटते. त्यामुळे शिवसेनेबरोबरची युती तोडावी, असे या गटाला वाटत आहे.

विजयी उमेदवारांना प्राधान्य द्यावे
भाजपने स्वबळावर निवडणूक लढवावी, या मताच्या भाजपमधील गटाचे म्हणणे आहे, की ज्या ठिकाणी भाजपची ताकद कमकुवत आहे, अशा ठिकाणी इतर पक्षातील ताकदवर उमेदवाराला पक्षप्रवेश देऊन ती जागा बळकट करावी. कॉंग्रेस, राष्ट्रवादी या विरोधी पक्षांतील अनेक आजी आणि माजी आमदार तसेच ताकदवान राजकीय घराणी भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी रांगेत आहेत. त्यांना पक्षात प्रवेश द्यावा व स्वबळावर सरकार स्थापन करावे, असे म्हणणे या गटाचे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT