uddhav thackeray and devendra fadnavis 
महाराष्ट्र बातम्या

इतके लोक सोडून गेले, त्यावेळी काही केलं नाही, २०२४ मध्येही...; भाजपचं ठाकरेंना प्रत्युत्तर

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - शिर्डीचे माजी खासदार भाऊसाहेब वाघचौरे यांनी नुकताचं उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली होती. त्याला आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले यांनी चोख प्रत्त्युत्तर दिलं आहे.

बावनकुळे म्हणाले की, घरात बसून जे पक्ष चालवतात ते कोणालाच संपवू शकत नाही. घरात बसूनच पक्ष गेला. उद्धव ठाकरे यांना पक्ष चालविण्याची सवय नाही. बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली शिवसेना, त्याचा दरारा आणि त्यांच काम, याचे आम्ही तीस वर्षांचे साक्षीदार आहोत.

इतके लोक सोडून गेले, त्यावेळी काही करू शकले नाही. इथून पुढे जे लोक सोडून जातील त्यांना देखील हे थांबवू शकणार नाही. ही क्षमता उद्धव ठाकरेंकडे नाहीच. पक्ष चालविण्यासाठी 24 तासातले अठरा तास काम करावं लागतं. त्यामुळे २०२४ पर्यंत उद्धव ठाकरे यांच्या स्टेजवर चार-पाचच लोक दिसतील, असा दावाही बावनकुळे यांनी केला.

शरद पवार यांची ओबीसी बाबत भूमिका काय आहे? हे सांगण्याची गरज नाही. ओबीसींना नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस सरकारमध्येच न्याय मिळाला. केंद्राची विश्वकर्मा योजना येत आहे. शरद पवार केंद्रात मंत्री होते, राज्यात सरकारमध्ये होते तेव्हा त्यांनी ओबीसी मंत्रालय निर्माण करण्याचं का सुचविले नाही?, असा सवालही बावनकुळे यांनी उपस्थित केला.

शेतकऱ्यांना कर्जफेडीसाठी आलेल्या नोटीसवर ते म्हणाले की, मी या संदर्भात अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलून शेतकऱ्यांकडून वसुली करू नये शेतकरी अडचणीत आहेत हे सांगणार आहे. ज्यांनी बँकेत गैरव्यवहार केला त्यांच्याकडून तो पैसा वसूल करावा अशी मागणी करणार असल्याचही बावनकुळे यांनी म्हटलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : पुण्यात महात्मा गांधीजींच्या पुतळ्याचे शिर उडवण्याचा प्रयत्न; एकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

Lottery Scam : लॉटरीच्या नावाखाली दाम्पत्याने 600 लोकांना 40 कोटींचा घातला गंडा; लोकांनी 5 ते 10 लाखांपर्यंत केली होती गुंतवणूक

Maharashtra Rain Update News : राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस, पुढील पाच दिवस महत्वाचे; ११ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

IT Park:'जमीन पसंत पडेना, आयटी पार्क होईना'; प्रशासनाचा कागदी खेळ, कृषि महाविद्यालयला पर्यायी प्रस्ताव मान्य नाही

Indian Railways: मिनिटाला निघणार दीड लाख तिकिटे; रेल्वे प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय,आरक्षण केंद्रातील यंत्रणेत बदल

SCROLL FOR NEXT