Devendra-Fadnavis
Devendra-Fadnavis 
महाराष्ट्र

'केंद्राने शेतकऱ्यांना जास्त भरपाई द्यावी'

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई - बोंडअळीमुळे कापूस, तुडतुड्यांमुळे धान आणि ओखी वादळामुळे मच्छीमारांच्या बोटींचे झालेले आर्थिक नुकसान मोठे असून केंद्र सरकारने त्यांना जास्तीत जास्त नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय पाहणी पथकाकडे केली. राज्य सह्याद्री अतिथिगृह येथे आज मुख्यमंत्र्यांच्या समवेत केंद्रीय पाहणी पथकाची आढावा बैठक झाली.

मुख्यमंत्री म्हणाले, 'कापसावरील बोंडअळीचा फटका राज्यातील 28 जिल्ह्यांना बसला असून, तुडतुड्यांमुळे सिंधुदुर्ग, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांतील धान पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने यापूर्वीच 3373.31 कोटी रुपयांचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठविला आहे.'' केंद्रीय पथकाचे प्रमुख तथा कृषी विभागाचे सहसचिव अश्विनीकुमार यांनी सांगितले, की केंद्रीय पाहणी पथकातील अधिकाऱ्यांनी गटागटाने विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांचा दौरा करून प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी संवाद साधून नुकसानीचा आढावा घेतला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jharkhand High Court: कायदेशीर प्रक्रियेशिवाय घर पाडता येणार नाही; बुलडोझर कारवाईसंदर्भात झारखंड हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

No Bread Sandwich: सकाळच्या नाश्त्यात बनवा हाय प्रोटिन नो ब्रेड सँडविच, जाणून घ्या रेसिपी

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Nana Patole : खोके द्या, फोडा अन् राज्य करा ; पटोलेंची मोदींवर टीका,राज्याचे नुकसान केल्याचा आरोप

Latest Marathi News Live Update : PM मोदींची माढा, धाराशिवसह लातूरमध्ये सभा, तर 25 वर्षानंतर वेल्ह्यात धडाडणार शरद पवारांची तोफ

SCROLL FOR NEXT