महाराष्ट्र

...म्हणून काँग्रेसचे शिष्टमंडळ भेटणार राज्यपालांना

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई : परतीच्या पावसाने राज्यभरात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. कापूस, सोयाबीन, कांदा, द्राक्ष या पिकांसह फळबागाचेही मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी. या मागणीसाठी काँग्रेस पक्षाचे शिष्टमंडळ राज्यपालांची भेट घेणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली. 

बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली व अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उपस्थितीत आज टिळक भवन येथे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकुल वासनिक, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिव व हिमाचल प्रदेशच्या प्रभारी रजनीताई पाटील यांच्यासह सर्व आमदार उपस्थित होते. 

या बैठकीत निवडणूक निकालासह परतीच्या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीबद्दल चर्चा करण्यात आली. राज्यात अद्यापही पाऊस सुरु असल्याने शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेले खरीप पूर्णपणे वाया गेले आहे. कापूस, सोयाबीन, कांदा, द्राक्ष बागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

कोकणातील भात शेती उद्धवस्त झाली आहे. फळबागांसह पशुधनाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गेल्या वर्षी दुष्काळात होरपळेला शेतकरी सावरण्यापूर्वीच तो ओल्या दुष्काळाचा सामना करत आहे. त्यामुळे परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीचे सरकारने तात्काळ पंचनामे करावेत व शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत द्यावी, या मागणीसाठी बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाचे शिष्टमंडळ राज्यपालांची भेट घेणार आहे.

सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे राज्यातील उद्योगधंदे अडचणीत आले आहेत. बेकारी वाढली आहे. त्याविरोधात अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीन देशभरात 5 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर दरम्यान आंदोलन करण्यात येणार आहे. त्याबाबतही या बैठकीत चर्चा करण्यात आली.  

दरम्यान, उद्या गुरुवार (ता. 31) ला सकाळी 11 वाजता टिळक भवन दादर येथे काँग्रेसच्या नवनिर्वाचीत आमदारांची बैठक बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Poonch Attack: दहशतवाद्यांनी हवाई दलाच्या वाहनांवर केलेल्या हल्ल्यात एक जवान शहीद; चार जखमी

'छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा नेता नको'; राहुल गांधींचा व्हिडिओ का होतोय ट्रेंड?

HD Revanna : मोठी बातमी! ...अखेर माजी पंतप्रधानांच्या मुलाला एसआयटीने घेतले ताब्यात, काय आहे कारण?

Broccoli Paratha: सकाच्या नाश्त्यात खा पौष्टिक ब्रोकोली पराठा,जाणून घ्या रेसिपी

Latest Marathi News Live Update : प्रचाराचा आज सुपरसंडे, तोफा थंडावणार; जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी

SCROLL FOR NEXT