महाराष्ट्र

'जलयुक्त'तील त्रुटी सरकारने स्वीकारल्या, देसरडा यांचा दावा

सकाळवृत्तसेवा

मुंबई : जलयुक्त शिवाराच्या तथाकथित यशाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागल्यानंतर जलयुक्त शिवार योजनेतील त्रुटी मान्य असून, "माथा ते पायथा' हे जलसंधारणाचे मूलभूत शास्त्रीय सूत्र एकात्मिक धोरण स्वीकारून बदल करण्याची तयारी आता राज्य सरकारने उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केल्याची माहिती नियोजन मंडळाचे माजी सदस्य एच. एम. देसरडा यांनी दिली. तसेच मुख्यमंत्री "जलयुक्त'च्या यशाचे करत असलेले दावे खोटे असल्याचा दावा करत देसरडा यांनी महाराष्ट्राच्या इतिहासातली ही सर्वांत फसवी योजना असल्याची टीकाही केली. 

मुंबई उच्च न्यायालयात दाखल जनहित याचिकेच्या अनुषंगाने न्यायालयाच्या आदेशाने माजी मुख्य सचिव जॉनी जोसेफ यांच्या तज्ज्ञ समितीचा अहवाल चार महिन्यांपूर्वी सादर झाला आहे. या समितीने जलयुक्त योजनेतील त्रुटी दाखवल्या असून, त्या राज्य सरकारने मान्य केल्या आहेत. आज उच्च न्यायालयात जलयुक्त शिवारासाठी एकात्मिक धोरण स्वीकारून त्यानुसार बदल करण्यात आल्याचे या वेळी स्पष्ट करण्यात आले आहे. 

देसरडा यांनी सांगितले, की जलयुक्त शिवार ही राज्यातली सर्वांत बोगस योजना आहे. या योजनेची कल्पना शास्त्रशुद्ध नसल्याने जमिनीतील पाण्याचे मूळ स्रोत, वाहता प्रवाह आणि "इको सिस्टीम' नेस्तनाबूत होत आहेत. जलयुक्त शिवार राजकीय हस्तक्षेप आणि कंत्राटदारांच्या मनमानीने नासवले गेले आहे. राज्य सरकारने जारी केलेला या योजनेचा शासन निर्णय चुकीचा असून, तो बदलण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली. 

जलयुक्त शिवार योजनेच्या कामातून 34 लाख हेक्‍टर क्षेत्र सिंचनाखाली आले व 24 टीएमसी पाणी साठा वाढल्याचा मुख्यमंत्र्यांनी केलेला दावा खोटा असल्याची टीका करून देसरडा म्हणाले, की त्याला कुठलाही शास्त्रीय पुरावा नाही. विजेचा वाढलेला वापर म्हणजे शेतकऱ्यांनी अधिक वीज वापरली हा दावा चुकीचा आहे. माथा ते पायथा हे जलसंधारणाचे मूलभूत सूत्र आहे. राज्यात 60 हजार मायक्रो वॉटरशेड आहेत. मग सरकार 5.5 लाख कामे सुरू असल्याचा दावा कसे करू शकते? 

रोजगार हमीची कामे नाहीत 
महाराष्ट्र राज्य, दुष्काळ निवारण व निर्मूलन मंडळाचे उपाध्यक्ष असलेले देसरडा आणि त्याच्या सहकाऱ्यांनी 22 जिल्ह्यांतील दुष्काळाची पाहणी केली. याविषयी ते म्हणाले, की रब्बीचे पीक कुठेच दिसत नाही. महाराष्ट्रात भीषण दुष्काळ आहे. पिण्याच्या पाण्यापासून जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. मोठ्या प्रमाणात स्थलांतर होण्याची शक्‍यता आहे. पण शहरातही रोजगार नाही. रोजगार हमीची कामे कुठेच होताना दिसत नाहीत, असे निरीक्षण त्यांनी नोंदवले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT