महाराष्ट्र

विखे पाटलांवर भाजपत तर क्षीरसागरांवर सेनेत नाराजी

सकाळ वृत्तसेवा

मुंबई: नुकतेच काँग्रेसमधून भाजपत आलेले राधाकृष्ण विखे पाटील आणि राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेले जयदत्त क्षीरसागर यांना मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळाल्याने त्यांच्याविषयी भाजप आणि सेनेतील निष्ठावंताना डावलून मंत्रिपद दिल्याने नाराजी आहे.  
बाहेरून आलेल्यांना थेट मंत्रिपद देण्यामुळे भाजप सेनेत नाराजी आहे. विखे नेहमीच सत्तेत असतात त्यांना आता भाजपमध्ये संस्कारीत करावे लागेल असे उदगार एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले आहेत. विखेंकडे कोणते खाते सोपवणार या बद्दल ज्येष्ठ मंत्री साशंक असली तरी निष्ठावंताना डावलून आयारामांना मंत्रिपद हा कुठला न्याय अशी भावना निष्ठावंतामधून व्यक्त होत आहे. सोबतच, क्षीरसागर यांच्या समावेशामुळे मराठवाड्यातील शिवसेनेचे काही आमदार नाराज आहेत.

दरम्यान, आगामी विधानसभा निवडणूक ऐन तोंडावर आली असताना गेल्या पावणेपाच वर्षांपासून रखडलेल्या राज्यमंत्रिमंडळाच्या विस्ताराला अखेर आज (ता. 16) मुहूर्त मिळाला. राजकीय लाभाचा विचार करून पक्षांतरे करणाऱ्या आयारामांना मंत्रिपदाचे नजराणे देण्यात आले असून विधानसभेतील माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे- पाटील यांना भाजपच्या कोट्यातून, तर जयदत्त क्षीरसागर यांना शिवसेनेकडून मंत्रिपद देण्यात आले आहे. विस्तारात विखे पाटील यांनी पहिली शपथ घेतली असल्यानेही मोठी नाराजी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tech Layoffs : यंदाचं वर्ष ठरतंय 'लेऑफ'चं.. एप्रिलपर्यंत टॉप टेक कंपन्यांनी 70,000 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना पाठवलं घरी!

कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवरुन PM मोदींचा फोटो काढला! आरोग्य मंत्रालयाने का घेतला निर्णय?

Mumbai Loksabha: वर्षा गायकवाडांना निवडणूक जाणार कठीण? या कारणामुळे नसीम खान नाराज

Goldy Brar: गोल्डी ब्रार जिवंत! कॅलिफोर्नियात मारलेली व्यक्ती दुसरीच; अमेरिकन पोलिसांचा खुलासा

Latest Marathi News Live Update : 11 दिवसानंतर मतदानाची आकडेवारी कशी आली; संजय राऊतांचा आरोप

SCROLL FOR NEXT