Drinking-Water after exercise
Drinking-Water after exercise Sakal
महाराष्ट्र

शरीराला किती पाणी लागते माहितीय का? भरपूर पाणी प्या अन्‌ लठ्ठपणा, डोकेदुखी,‌ अपचनापासून मुक्त व्हा

तात्या लांडगे

सोलापूर : सृष्टीतील प्रत्येक सजीवाला जगण्यासाठी पाण्याची गरज असतेच. पण, पाणी पिण्याची योग्य पद्धत, वेळ माहिती असणे शरीरासाठी खूप महत्त्वाची ठरते. आपल्या शरीरात ७५ टक्के आणि लहान बालकांच्या शरीरात पाण्याचे प्रमाण ८० ते ८५ टक्के असते. योग्यवेळी पुरेशा प्रमाणात पाणी पिल्यास लठ्ठपणा, डोकेदुखी व अपचन अशा समस्या दूर होतात. शरीरातील अनेक व्याधी स्वच्छ पाण्यामुळेच नष्ट होतात. या पार्श्वभूमीवर पाण्याचे स्रोत अस्वच्छ होणार नाहीत, याची दक्षता घेण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे.

पाणी पिण्याची गरज का?

प्रत्येक व्यक्तीला पाण्याची गरज भासते. पाण्याशिवाय अन्नपचन अशक्यच. पाण्याविना कोणीही जिवंत राहू शकत नाही. शरीराचा सर्वाधिक भाग पाण्यानेच व्यापलेला असतो. पाणी कमी पिल्याने डिहायड्रेशन होऊ शकते. त्यातून आपल्या अवयवांचे नुकसान होते. वयोवृद्ध लोकांना तर शरीरात पाणी कमी असल्याने अनेकवेळा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची वेळ येते. सुदृढ आरोग्यासाठी पाणी खूप महत्त्वाचे आहे.

तुम्ही पुरेसे पाणी पिता का?

वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, पाण्याचे कोणतेही प्रमाण निश्चित नसते. वेळ, ठिकाण, ऋतुमानानुसार कमी-जास्त प्रमाण असू शकते. प्रत्येकाने स्वत:जवळ विशेषत: प्रवासात पाण्याची बाटली ठेवायला हवी, जेणेकरून तहान लागल्यावर पाणी पिता येईल. एकाचवेळी तीन-चार ग्लास पाणी पिण्याची गरज नसते. काही तासांनी थोडे थोडे पाणी पिल्यास फायदेशीर ठरते. वयोमानानुसार व वजनानुसार पाण्याचे प्रमाण ठरलेले असते. परंतु, १२ वर्षांवरील प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात नियमित किमान साडेतीन लिटर पाणी आवश्यक असते.

झोपेतून उठल्यावर प्या पाणी

रात्रभर शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते. त्यामुळे सकाळी उठल्यावर किमान एक ग्लास तरी पाणी प्यायलाच हवे. त्यामुळे रक्त घट्ट होत नाही. रक्त घट्ट झाल्यानंतर हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. त्यामुळे शरीरातील पाणी कमी होऊ न देणे सुदृढ आरोग्याचे उत्तम लक्षण मानले जाते. हृदयविकार व किडनीचे आजार असलेल्यांनी पाण्याचे प्रमाण डॉक्टरांना विचारूनच निश्चित करावे. वजन वाढले आणि शरीरातील पाणी जास्त झाल्यास त्यांना त्रास होऊ शकतो.

गरम की थंड पाणी चांगले?

हिवाळ्यात भूक जास्त लागते आणि पचन देखील अधिक होते. त्यामुळे हिवाळ्याला लठ्ठपणा वाढीचा हंगाम मानला जातो. जेवणानंतर पाणी पितो, ते पाणी सामान्य असलेले चांगले. ३०० ते ३५० टीडीएस असलेले आणि चवीला गोड असलेले पाणी शरीरासाठी चांगले असते. उन्हाळ्यात गरम पाणी पिण्याची काही गरज नाही. फ्रीजमधील पाणी नक्कीच आपले नुकसान करते. त्यामुळे फ्रीजमधील पाणी पिणे शक्यतो टाळावे. हिवाळ्यात कोमट पाणी शरीरासाठी फायदेशीर ठरते. वजन कमी करण्यासाठी कोमट पाणी फायदेशीर आहे. सामान्य पाणी (क्षार कमी असलेले) पिणे शरीरासाठी उत्तम असते.

जेवताना पिलेले पाणी ठरते अमृत

फळांमध्ये भरपूर पाणी असते. त्यामुळे पाणीदार फळे खाल्ल्यावर पाणी पिऊ नये. तसेच भात बनवल्यास ते भरपूर पाणी शोषून घेते. त्यामुळे भात खाल्ल्यानंतरही पाणी पिऊ नये. अर्ध्या तासाने गरजेपुरते पाणी प्यावे. परंतु, जेवण करताना अधूनमधून पिलेले पाणी अमृतासमान असते. त्यामुळे घासासोबत पाणी शरीरात जाते आणि अन्नाचे पचन सुलभ होते. मात्र, अनेकजण जेवण झाल्याबरोबर लगेचच पाणी पितात. तसे न करता जेवणानंतर किमान दीड ते दोन तासांनी पाणी प्यावे, जेणेकरून अपचनाचा त्रास होणार नाही.

वयोमानानुसार असे ठेवा प्रमाण

१ ते ५ वर्षे : अर्धा लिटर

६ ते १२ वर्षे : एक लिटरपर्यंत

१२ वर्षांवरील : किमान साडेतीन लिटर

६० किलोपेक्षा अधिक वजन : ३.५ लिटर

पाणी हेच जीवन...

निरोगी आरोग्यासाठी पाणी तितकेच चांगले असते आणि त्यामुळेच पाण्याला जीवन म्हणतात. पाण्याशिवाय व्यक्ती दोन-तीन दिवसांवर जिवंत राहू शकत नाही. त्यामुळे पाणी वाचवणे व त्याचा योग्य वापर करणे आवश्यक आहे. पाण्यामध्ये ऑक्सिजन विरघळतो. मासे पाण्यातील ऑक्सिजन घेऊन जिवंत राहतात. पाणी रंगहीन असते, पाण्याला स्वत:ची चव नसते. पाण्याच्या एका विशिष्ट गुणधर्मामुळे सृष्टीमध्ये पाण्याचे स्थान एकमेवाद्वितीय आहे. अणुबाँब बनवण्यासाठी लागणारे जड पाणी हा पाण्याचा दुसरा प्रकार मानला जातो. पाणी ही माणसाची मूलभूत गरज आहे. पाण्यापासून वीज देखील तयार होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Shreyas Talpade: कोरोना लसीमुळे हृदयविकाराचा झटका आला? श्रेयस तळपदे म्हणाला,'लस घेतल्यानंतर मला...'

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : चाहरनं सीएसकेला पाडलं खिंडार, ऋतुराज पाठोपाठ दुबेलाही केलं बाद

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

SCROLL FOR NEXT