Drought-Subsidy
Drought-Subsidy 
महाराष्ट्र

दुष्काळाचे अडीच हजार कोटी द्या!

सकाळवृत्तसेवा

सोलापूर - केंद्र सरकारच्या मदतीतून दुष्काळात तरी कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची चिंता दूर होईल, अशी आशा बळिराजाला होती. मात्र, केंद्र सरकारने मंजूर केलेल्या चार हजार ५० कोटींपैकी आतापर्यंत दोन हजार कोटी रुपयेच राज्य सरकारला दिले आहेत. दुष्काळाची तीव्रता वाढत असल्याने शेतकऱ्यांना मदत करण्यास राज्य सरकारला केंद्र सरकारने उर्वरित रक्‍कम तत्काळ द्यावी, असे पत्र मदत व पुनर्वसन विभागाने पाठविल्याचे सूत्रांनी सांगितले.

पावसाअभावी मागील वर्षी रब्बी व खरीप वाया गेला. शेतमालाचे अधिक नुकसान झाल्याने राज्य सरकारने आठ हजार कोटी रुपयांच्या मदतीचा प्रस्ताव केंद्र सरकारला दिला. 

मात्र, केंद्र सरकारने ५० टक्‍क्‍यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी साडेचार हजार कोटी रुपये मंजूर केले. 

तीन महिन्यांहून कालावधी लोटला तरीही केंद्र सरकारकडून संपूर्ण रक्‍कम राज्य सरकारला मिळाली नाही. त्यामुळे बीड, जालना, सोलापूर, नाशिक, नगर, यवतमाळ, औरंगाबाद, परभणी, उस्मानाबाद जिल्ह्यांमधील बहुतांश दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्‍न गंभीर बनल्याने पोटाची खळगी भरण्याकरिता अनेक कुटुंबांनी अन्य ठिकाणी स्थलांतर केल्याचे चित्र आहे.

केंद्र सरकारने मंजूर केलेल्या चार हजार ५६० कोटींच्या दुष्काळ अनुदानातील दोन हजार कोटी रुपये राज्याला मिळाले आहेत. उर्वरित रकमेची मागणी केली आहे; परंतु अद्यापही ते मिळालेले नाहीत. राज्यातील ६७ लाख शेतकऱ्यांना दुष्काळ अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे. 
- सुभाष उमराणीकर, उपसचिव, मदत व पुनर्वसन विभाग, मुंबई

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT