महाराष्ट्र

तपास संस्थांच्या माध्यमातून विरोधी पक्षांना टार्गेट केलं जातंय : नारायण राणे

वृत्तसंस्था

मुंबई : सक्तवसुली संचालनालय (ईडी) आणि केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) यांसारख्या संस्थांकडून केल्या जाणाऱ्या कारवाईवर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी भाजपवर निशाणा साधला. ''तपास संस्थांच्या माध्यमातून विरोधी पक्षांना टार्गेट केलं जात आहे'', असे नारायण राणे म्हणाले. 

गेल्या काही दिवसांपासून ईडी, सीबीआयकडून अनेक नेत्यांवर कारवाई केली जात आहे. त्यावर नारायण राणे यांनी वक्तव्य केले. ते म्हणाले, एखाद्या व्यक्तीला बदनाम करायचे असल्यास यासाठी काही एजन्सी काम करत आहेत. मी त्या एजन्सीच्या म्होरक्यांना पकडले. त्यांना मी विचारले की असे का करत आहात, तेव्हा त्यांनी काही जणांच्या आदेशावरून असे करावे लागत आहे, असे सांगितले.

...वेळ आल्यावर सांगेन

सात-एक लोकांची टीम आहे. त्यामध्ये काही वकिलांचा समावेशही आहे. काही सीएही आहेत. भुजबळांचाही त्याच टीमने बळी घेण्याचा प्रयत्न केला होता. ती टीम कसे काम करते आणि ते विरोधकांना कसे 'ब्लॅकमेल' करत आहेत. हे वेळ आल्यावर सांगेन.  

नेत्यांना बदनाम करणे एजन्सीचे काम

तपास संस्था कोणासाठी काम करतात की, पैशासाठी काम करतात हे मी सांगू शकत नाहीत. मात्र, नेत्यांना बदनाम करण्यासाठी एजन्सी काम करत आहेत, असा आरोपही राणे यांनी यावेळी केला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tech Layoffs : यंदाचं वर्ष ठरतंय 'लेऑफ'चं.. एप्रिलपर्यंत टॉप टेक कंपन्यांनी 70,000 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना पाठवलं घरी!

कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवरुन PM मोदींचा फोटो काढला! आरोग्य मंत्रालयाने का घेतला निर्णय?

Mumbai Loksabha: वर्षा गायकवाडांना निवडणूक जाणार कठीण? या कारणामुळे नसीम खान नाराज

Goldy Brar: गोल्डी ब्रार जिवंत! कॅलिफोर्नियात मारलेली व्यक्ती दुसरीच; अमेरिकन पोलिसांचा खुलासा

Latest Marathi News Live Update : 11 दिवसानंतर मतदानाची आकडेवारी कशी आली; संजय राऊतांचा आरोप

SCROLL FOR NEXT