Eknath Shinde Nana Patekar Maharashtra Political Crisis Shivsena Uddhav Thackrey  esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Political Crisis : शिवसेना विभागल्यानंतर माझ्या घरातही फूट; नाना पाटेकरांचं मोठं विधान

सकाळ डिजिटल टीम

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर शिवसेनेत उभी फुट पडली. शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेच्या 40 आमदार आणि 12 खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर शिवसेना आणि शिंदे गटातील नेते मंडळींनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यास सुरूवात केली आहे. अशातच, शिवसेनेच्या या फुटीवर अभिनेते नाना पाटेकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. (Eknath Shinde Nana Patekar Maharashtra Political Crisis Shivsena Uddhav Thackrey)

जवळपास तीन महिन्यांपूर्वी राज्यात राजकीय भुकंप झाल्याचे पाहायला मिळाले. शिवसेनेला खिंडार पडली आणि राज्याच्या राजकारणाला नवं वळण लागलं. एकनाथ शिंदे चाळीसहून अधिक आमदारांच्या साथीनं पक्षातून बाहेर पडले आणि त्यांनी बंडखोरी केली.

शिंदे गटानं कोणत्याही पक्षात प्रवेश न करता आपला गट म्हणजेच खरी शिवसेना असल्याचा दावा ठोकला आहे. शिवसेना नक्की कोणाची याची कायदेशीर लढाई सुरू आहे. अशातच, एका कार्यक्रमादरम्यान बोलताना नाना पाटेकर यांनी शिवसेनेत झालेल्या गटबाजीबाबत भाष्य केलं आहे.

काय म्हणाले नाना पाटेकर?

‘एकनाथराव, राष्ट्रवादी, समाजवादी, काँग्रेस सगळे वेगळे पक्ष. पण, शिवसेना विभागली गेल्यानंतर आमची घरंही विभागली गेली. माझे वडील किंवा भावंड, मुलं यांच्यामध्ये दोन गट पडले आहेत. हे प्रकरण आता तुमच्यापर्यंत मर्यादित न राहता ते वाढत गेलं आहे. त्याचं काय करायचं आम्ही? तुमच्यातली भांडणं कदाचित उद्या मिटतील आमच्यातल्या भांडणांचं काय? तळागाळात, गावागावात ही भांडणं सुरुयेत, पण आमच्यातल्या भांडणांचं काय करायचं?’, हा भाबडा प्रश्न नानांनी एक सर्वसामान्य मतदार म्हणून विचारला. उद्या तुम्ही या कुटनितींना राजकारणाचं नाव द्याल, असं म्हणत पक्षामध्ये माजलेल्या या दुफळीवर त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली.

मतदार म्हणून आम्हाला किंमत आहे का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. त्यांच्या या प्रश्नावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं. आमची किंमत तुमच्या भरवशावर ठरते. तीन महिन्यांपूर्वी आम्ही जे केलं, तो मतदारांचा आदरच केला. 2019 ला जे होणं अपेक्षित होतं ते आम्ही केलं. मतदारांनी सेना-भाजप युतीला निवडून दिलं. त्याप्रमाणे सरकार स्थापन होईल असं वाटत असतानाच तसं झालं नाही. पण, आम्ही ते तीन महिन्यांपूर्वी केलं’, यावर प्रतिप्रश्न करत त्यासाठी अडीच वर्ष का लागली? अशी गुगलीही नानांनी टाकली. यावर प्रयत्न सुरु होता पण, तीन महिन्यांपूर्वी त्याला यश मिळालं असे उत्तर फडणवीसांनी दिलें.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Air Pollution : दिल्लीतील वायू प्रदूषण कोरोनापेक्षाही घातक, 'या' लोकांना ताबडतोब शहर सोडण्याचा सल्ला

राहुरी तालुक्यातील धक्कादायक घटना! 'जमिनीच्या आमिषाने महिलेवर अत्याचार';खोटे मृत्युपत्र तयार करुन जमीन बळकावली..

Latest Marathi News Live Update : ..अखेर प्रशासनाला आली जाग; कारखानदार-संघटनांची आज महत्त्वाची बैठक

Daily horoscope: आजचे राशिभविष्य-३ नाेव्हेंबर २०२५

महिला वर्ल्ड कपच्या ५२ वर्षांच्या इतिहासात कुणाला जमलं नव्हतं, दीप्तीने केला विश्वविक्रम

SCROLL FOR NEXT