तापमान वाढले sakal
महाराष्ट्र बातम्या

प्रत्येकांनी बजावावा मतदानाचा हक्क! तापमानाचा पारा वाढतोय, ‘अशी’ घ्या स्वत:ची काळजी; उन्हाचा जाणवणार नाही त्रास

लोकशाहीचा उत्सव आज साजरा होत असून त्याचा हिस्सा आपण सर्वांनी व्हायलाच हवे. दरम्यान, सध्या उन्हाचा पारा वाढत असल्याने मतदानाला जाताना शक्यतो अंगात सुती कपडे असावेत. सोबत पाण्याची बाटली ठेवा, डोक्यावर टोपी असावी. जेणेकरून उन्हाचा त्रास होणार नाही.

तात्या लांडगे

सोलापूर : लोकशाहीचा उत्सव आज साजरा होत असून त्याचा हिस्सा आपण सर्वांनी व्हायलाच हवे. दरम्यान, सध्या उन्हाचा पारा वाढत असल्याने मतदानाला जाताना शक्यतो अंगात सुती कपडे असावेत. सोबत पाण्याची बाटली ठेवा, डोक्यावर टोपी असावी. जेणेकरून उन्हाचा त्रास होणार नाही. पण, उन्हामुळे मतदानाला नको जायला, अशी मानसिकता ठेवू नका, असे आवाहन सर्वांनी केले आहे.

सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारी (ता. ७) मतदान पार पडणार आहे. सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया चालणार आहे. मतदानाची टक्केवारी वाढावी, प्रत्येकांनी मतदान करावे यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय यंत्रणांनी जनजागृती केली आहे. आता प्रत्येकांनी ‘आपले मत हेच आपला आवाज’ समजून आपला लोकप्रतिनिधी निवडायचा आहे. उन्हाची तीव्रता जास्त आहे म्हणून मतदानाला जायचे टाळू नका. प्रत्येकांनी आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. पण, कडक उन्हात बाहेर पडताना मतदारांनी स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्यावी, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.

अशी घ्यावी सर्वांनीच काळजी

  • डोक्यावर टोपी, छत्रीचा वापर करावा

  • उन्हात पूर्णवेळ तथा जास्त वेळ थांबू नये

  • डोळ्यावर चष्मा किंवा गॉगल घालावा

  • जेवण किंवा नाष्टा करून बाहेर पडावे, जेणेकरून उन्हाचा त्रास कमी होईल

  • उन्हात बाहेर पडताना सोबत पाण्याची बाटली असावी

  • पांढऱ्या रंगाचे किंवा फिकट रंगाचे सुती व सैल कपडे घालावेत

  • उन्हातून गेल्यावर लगेचच अतिथंड पाणी पिऊ नये

  • उन्हात दुचाकीवरून प्रवास करत असल्यास हात झाकण्यासाठी संकोटचा वापर करावा

उन्हातून घरी आल्यावर अशी काळजी घ्या...

उन्हात बाहेर जात असाल तर डोक्यावर टोपी, डोळ्यावर गॉगल असावा. सैल व सुती पांढऱ्या रंगाची किंवा फिकट रंगाची कपडे अंगात असावेत. उन्हातून जाऊन आल्यावर शरीरातील पाणी कमी होते, त्यामुळे घरी आल्यावर पाणी प्यावे. पण, लगेचच व अतिथंड पाणी पिऊ नये. खूप थकवा जाणवत असल्यास लिंबू शरबत किंवा ग्लुकॉन-डी प्यावे. तसेच दहा मिनिटांनी थंड पाण्याने हातपाय, डोळे धुवावेत. जेणेकरून उष्णतेचा त्रास जाणवणार नाही.

- डॉ. गायत्री देशपांडे, आयुर्वेदिक तज्ज्ञ, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT