महाराष्ट्र

दिव्यांगासाठी पाच टक्‍के निधी

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई - राज्यातील महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती, नगर परिषदांच्या वार्षिक अंदाजपत्रकांत दारिद्य्रनिर्मूलन योजनेअंतर्गत दिव्यांग व्यक्‍तींसाठी किमान पाच टक्‍के निधी राखून ठेवण्याचा निर्णय नगरविकास विभागाने घेतला आहे. 

केंद्र सरकारच्या दिव्यांग व्यक्‍तींसाठी समान संधी, संरक्षण व समान सहभाग कायदा १९९५ हा एक वर्षानंतर म्हणजे १९९६ पासून लागू करण्यात आला आहे. यातील तरतुदींनुसार राज्यातील सर्व महापालिका, नगरपालिका यांना त्यांच्या अर्थसंकल्पात दारिद्य्रनिर्मूलन कार्यक्रमांतर्गत अपंगांसाठी किमान निधी तीन टक्‍के इतका राखीव ठेवण्याबाबत तरतूद आहे. या कायद्यामध्ये सुधारणा करून केंद्र सरकारचा निःसमर्थ (दिव्यांग) व्यक्‍ती हक्‍क अधिनियम २०१६ हा कायदा लागू करण्यात आला आहे. त्यातील तरतुदीनुसार दारिद्य्रनिर्मूलन कार्यक्रमात पाच टक्‍के निधी दिव्यांग व्यक्‍तींसाठी राखीव ठेवण्यात आला आहे; तसेच महिलांसाठी अग्रक्रमाने हा निधी खर्च करण्यात यावा, असे निर्देश दिले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suchrita Mohanti: काँग्रेसच्या उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

Indian Constitution : '...तर मोदी सरकारने केव्हाच देशाचे संविधान बदलले असते'

Pratik Gandhi : प्रतीक साकारतोय गांधी ; हॅरी पॉटर फेम 'या' अभिनेत्याची सिनेमात वर्णी

Reels Addiction : इन्स्टाग्राम अन् यूट्यूबचं कशामुळे लागतंय व्यसन? जाणून घ्या कसं काम करतं अल्गोरिदम..

Rishabh Pant: "ऋषभ पंतसोबत लग्न कर, तो तुला खुश ठेवेल..."; नेटकऱ्याची कमेंट, उर्वशीनं अवघ्या दोन शब्दात दिलं उत्तर

SCROLL FOR NEXT