FSSAI Rules Will Hit Small Traders 
महाराष्ट्र बातम्या

या कायद्यामुळे येणार देशातील तब्बल दोन कोटी दुकानदार अडचणीत

राजेश रामपूरकर

नागपूर :  भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने लागू केलेल्या नवीन कायद्यामुळे देशभरातील अंदाजे दोन कोटी लहान दुकानदार अडचणीत येणार आहेत. यामुळे या दुकानदारांचा १५ लाख कोटींचा व्यवसाय संपुष्टात येणार आहे. लहान व्यापारी पहिलेच कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अडचणीत सापडलेले आहेत. आता खाद्य सुरक्षा प्राधिकरणाच्या नव्या  कायद्या व महामारीमुळे आर्थिक अडचणीत आलेल्या लहान दुकानदारांना नव्या समस्यांचा सामना करावा लागणार असल्याने अखिल भारतीय व्यापारी महासंघाने (कॅट) केंद्रीय आरोग्य मंत्री व वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांना पत्र पाठवून हा नवीन कायदा रद्द करावा अशी मागणी केलेली आहे. 


भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने चार सप्टेंबर २०२० ला अधिसूचना काढली असून त्यात खाद्य सुरक्षा आणि मानकात शाळेतील मुलांना सुरक्षित भोजन आणि संतुलित आहारा बाबत जाचक अटी लादल्या आहेत. त्यामध्ये चरबी वाढवणारे, चिनी अथवा सोडिअम युक्त कोणतेही सामान शाळेच्या प्रवेशद्वारापासून ५० मीटर अंतरावर विद्याथ्यांना विक्री करण्यास मज्जाव केला आहे. कॅटचा याला तीव्र विरोध असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकल टू वोकल आणि आत्मनिर्भर भारताच्या केलेल्या आव्हानाचे हे उल्लंघन असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

हा कायदा लहान व्यापाऱ्यांचा व्यवसाय बंद करण्याचे आखलेले षड्यंत्र आहे. देशांतर्गत व्यापाऱ्याला अस्थिर करण्याचा डाव आहे. सरकारने हा निर्णय घेताना व्यापारी संघटनासोबत चर्चा न करता हुकूमशाही पद्धतीने सरकारने निर्णय घेत असल्याचा आरोपही कॅटचे अध्यक्ष बी.सी. भरतीया यांनी केला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

Nashik News : नाशिकला दिलासा! पावसाने उसंत घेतल्याने गंगापूर धरणाचे दरवाजे बंद; पूरस्थिती निवळली

महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण! 'शिवरायांच्या किल्ल्यासाठी PM मोदींनी केले विशेष प्रयत्न'; UNESCO च्या मानांकनानंतर काय म्हणाले फडणवीस?

Record Breaking : १० चौकार, १२ षटकार! ३५३ च्या स्ट्राईक रेटने शतक; ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये भीमपराक्रम, २९ धावांत ९ गेल्या तरी संघ जिंकला

Latest Marathi News Updates : जयंत पाटील हे घाबरणारे नेते नाहीत - रोहित पवार

SCROLL FOR NEXT