अभ्यास
अभ्यास 
महाराष्ट्र

अभ्यास तरी किती दिवस करायचा? बारावीचे विद्यार्थी कंटाळले

संदीप लांडगे

औरंगाबाद : कोरोनामुळे केंद्रासह राज्य शासनान (Maharashtra State) दहावीची परीक्षा रद्द (SSC Board Exam) केली आहे. तर बारावीच्या परीक्षा (HSC Exam Board) पुढे ढकलल्या आहेत. वर्षभरापासून बारावीचे विद्यार्थी (Student) अभ्यासच करत आहे. आता विद्यार्थी देखील अभ्यासाला कंटाळले आहेत. त्यामुळे किती दिवस आभ्यास करायचा? असा प्रश्‍न विद्यार्थ्यांकडून विचारण्यात येत आहे. कोरोनामुळे (Corona) नवीन शैक्षणिक वर्ष २०२१ ऑनलाईनच्या माध्यमातून सुरु झाले होते. परीक्षेच्या अनुषंगाने शाळा, महाविद्यालयांनी बारावीचे वर्ग मार्चपासूनच ऑनलाईन सुरु केले होते. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर नोव्हेंबर पासून प्रत्यक्ष वर्ग सुरु करण्यात आले होते. त्यावेळी सर्व शाळा (Schools), महाविद्यालयांकडून (Colleges) बारावीचा जवळपास सर्व अभ्यासक्रम पुर्ण झाला होता. फेब्रुवारीत परीक्षा सुरु होतील अशी महाविद्यालयांना आशा होती. (HSC Students Are Bored Continuous Study)

मात्र राज्य शिक्षण मंडळाने (State Education Board) एप्रिल महिन्यात बारावीच्या परीक्षा होणार असल्याचे जाहीर केले. त्याअनुषंगाने वेळापत्रक देखील प्रसिद्ध केल. परीक्षेच्या दृष्टीकोणातून विद्यार्थ्यांची आभ्यासाची तयारी पुर्ण झालेली होती. अनेक महाविद्यालयांनी सराव चाचणी परीक्षा ऑनलाईनच्या माध्यमातून घेणे सुरु ठेवले होते. मात्र, जानेवारीत पुन्हा कोरोनाचा उद्रेक झाल्याने रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली. त्यामुळे बारावीच्या परीक्षा घेण्यावर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य शासनाने दहावीच्या बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला;तर बारावीच्या परीक्षा जूनमध्ये घेण्यात येतील असे सांगीतले. त्यामुळे बारावीच्या विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे.

मार्च २०२० पासून ऑनलाईन बारावीचे वर्ग सुरु आहेत. तेरा महिने होवून गेले तरीही दररोज आभ्यास सुरुच आहे. आता बारावीच्या परीक्षेचे टेन्शन आहे. वर्षभरापासून नियमित पुस्तक वाचन, लेखन सुरू असल्याने आता कंटाळा आला आहे.

- प्रथमेश कदम, विद्यार्थी

वारंवार पुढे जाणाऱ्या परीक्षेच्या तारखामुळे अभ्यासावर केंद्रित झालेले लक्ष विचलित होत आहे. जूनमध्ये देखील परीक्षा होईल का? याबाबत खात्री नाही. आधीच ऑनलाइन पद्धतीने व्यवस्थित शिकता आले नाही. त्यामुळे शासनाने परीक्षेबाबत ठोस निर्णय घ्यावा असे वाटते.

- अविनाश कुटे, विद्यार्थी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Nana Patole : खोके द्या, फोडा अन् राज्य करा ; पटोलेंची मोदींवर टीका,राज्याचे नुकसान केल्याचा आरोप

Sakal Podcast : बीड पंकजा मुंडेंना अवघड जाणार? ते ‘मर्द’ला पराभवाचा ‘दर्द’च होत नाही

Latest Marathi News Live Update : PM मोदींची माढा, धाराशिवसह लातूरमध्ये सभा, तर 25 वर्षानंतर वेल्ह्यात धडाडणार शरद पवारांची तोफ

Water Scarcity : पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा वणवण ; राज्यात भीषण टंचाई,७४९५ वस्त्यांवर टँकरद्वारे पुरवठा

SCROLL FOR NEXT