Uddhav-Thackeray
Uddhav-Thackeray 
महाराष्ट्र

विमा कंपन्यांना अल्टिमेटम - उद्धव ठाकरे

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई - राज्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्‍कम मिळालीच पाहिजे. यासाठी विमा कंपन्यांनी आणि बॅंकांनी १५ दिवसांत जी काही प्रकरणे आहेत, ती निकाली काढली काढावीत; अन्यथा आम्ही सोळाव्या दिवसापासून शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज दिला.

राज्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याची भरपाई मिळालेली नसून, शिवसेनेने याविरोधात मुंबईत आज मोर्चा काढला. हा मोर्चा वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी) भारती ॲक्‍सा कंपनीवर धडकला. ‘शिवसेना झिंदाबाद’, ‘आवाज कुणाचा, शिवसेनेचा’ अशा घोषणांनी सारा परिसर दणाणून गेला. उद्धव ठाकरे यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले. या वेळी युवा सेनेचे आदित्य ठाकरे, खासदार विनायक राऊत, खासदार अनिल देसाई, आमदार अनिल परब, शिवसेना सचिव आदेश बांदेकर सहभागी झाले होते.

शेतकऱ्यांना नाडणाऱ्यांना धडा शिकवल्याशिवाय शिवसेना गप्प बसणार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले. सरकारच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोचल्याच पाहिजेत. कर्जमाफी झालेल्या सर्व शेतकऱ्यांची नावे बॅंकांनी नोटीस फलकावर 
लावली पाहिजेत, अशी मागणी त्यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT