Jitendra Awhad 
महाराष्ट्र बातम्या

जितेंद्र आव्हाड उद्धव ठाकरेंना म्हणाले, आता संचारबंदी हाच उपाय

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असून, रुग्णांची संख्या 89 झाली आहे. नागरिक गांभीर्याने घेत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता संचारबंदी हाच एकमेव उपाय आहे, असे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या ८९ वर जाऊन पोहोचली आहे. आतापर्यंत तीन बळी कोरोनाने घेतले आहेत. काल एक दिवसाचा 'जनता कर्फ्यू' झाला. पण लोक पुन्हा मूळपदावर आले आहेत. मुंबईसारख्या शहरात सार्वजनिक वाहतूक बंद असली तरी खासगी वाहनांतून प्रवास करणाऱ्यांची संख्या कमी व्हायला तयार नाही. अशावेळी खरंतर संचारबंदी असायला हवी, असे ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.

मुंबईतील टोलनाक्यावर वाहनांची गर्दी झाल्याचे आज सकाळी वाहिन्यांवर दाखविण्यात आल्यानंतर सरकारने दखल घेतली आहे. नागरिकांच्या जिवाशी खेळू नका, घराबाहेर पडून नका असे आवाहन सरकारकडून करण्यात येत आहे. यावर आव्हाड यांनी ट्विट करत म्हटले आहे, की तुमच्या कामाची प्रशंसा होते आहे पण काही जण गंभीर नाहीत. संकट किती भयंकर आहे याची कल्पना काही लोकांना नाही. लॉक डाउनने भागेल असे वाटत नाही संचारबंदी लागू करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Iran Tension: पाकिस्तानची मध्यस्थी निष्फळ ठरली! इराणसोबतचा करार संपुष्टात; डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, तणाव वाढणार

Persistent Bone Pain: हाडांमध्ये सतत वेदना होतात? दुर्लक्ष करू नका; असू शकतात 'या' गंभीर आजारांचा इशारा

Water Crisis: आज पूर... उद्या पाण्यासाठी युद्ध? २०५० पर्यंत भारत 'Water Scarce' देश होण्याचा इशारा

Latest Marathi News Live Update : पुण्यातील सर्वच मुख्य रस्त्यांवर वाहतूक कोंडी

UP Gangster Act: यूपीच्या कुख्यात गँगस्टरला महाराष्ट्रात मोठा झटका; उमरग्यातील दाल मिलसह १०० कोटींची मालमत्ता जप्त..

SCROLL FOR NEXT