महाराष्ट्र बातम्या

कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण नवलखा, तेलतुंबडे यांना दिलासा 

सकाळवृत्तसेवा

मुंबई  - कोरेगाव-भीमा हिंसाचारप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते गौतम नवलखा आणि आनंद तेलतुंबडे यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला. पुढील सुनावणी होईपर्यंत त्यांच्यावर कोणतीही कारवाई करू नये, असे आदेश न्यायालयाने शुक्रवारी पोलिसांना दिले. पुणे पोलिसांनी नोंदवलेला गुन्हा रद्द करण्यासाठी नवलखा आणि तेलतुंबडे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर 26 ऑक्‍टोबरला सुनावणी घेण्यात येईल, असे न्या. रणजित मोरे आणि न्या. भारती डांगरे यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले. 

सर्वोच्च न्यायालयाने नवलखा यांना अटक न करण्याबाबत आधीच दिलासा देत 26 ऑक्‍टोबरपर्यंत कारवाई करण्यास मनाई केली आहे, अशी माहिती सरकारी वकील अरुणा कामत-पै यांनी खंडपीठाला दिली. त्यानंतर न्यायालयाने सुनावणी तहकूब केली. कोरेगाव-भीमा हिंसाचारप्रकरणी आणि नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून पुणे पोलिसांनी नवलखा आणि तेलतुंबडे यांच्याविरोधात ऑगस्टमध्ये गुन्हा दाखल केला होता. कोणतेही पुरावे नसताना या प्रकरणात आपल्याला नाहक गोवण्यात येत असल्याचा आरोप करून पुणे पोलिसांनी नोंदवलेला गुन्हा रद्द करण्यासाठी नवलखा यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे; तर तेलतुंबडे यांनीही घरावर छापे घालून संशयावरून चौकशीसाठी प्रथम दर्शनी अहवाल (एफआयआर) केल्याविरोधात याचिका दाखल केली आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ‘’नितीश कुमार यांना भारतरत्न द्या’’, जेडीयू नेते केसी त्यागींची पत्राद्वारे पंतप्रधान मोदींकडे मागणी!

WPL 2026 : Nadine de Klerk ची अष्टपैलू कामगिरी, RCB ने थरारक सामन्यात मारली बाजी; गतविजेत्या MI ची हार

महत्त्वाची बातमी! महापालिका निवडणुकीचा प्रचार मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजता थांबणार; उमेदवारांचे पदयात्रा, घरोघरी भेटींवर भर, सोशल मिडियाचा वापर, वाचा...

Rahul Gandhi Attacks on BJP : दूषित पाणी, विषारी कफ सिरप ते अंकिता भंडारी हत्या ; राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात!

HSC Hall Ticket 2026 : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! परीक्षेचे प्रवेशपत्र 'या' दिवसापासून मिळणार!

SCROLL FOR NEXT