महाराष्ट्र

Loksabha 2019 : वाढत्या तापमानामुळे उमेदवारांची दमछाक 

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई - राज्यात लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील अर्ज भरण्याची मुदत संपली असून, प्रचाराला सुरवात झाली असली; तरी वाढत्या उष्णतेमुळे सर्वपक्षीय उमेदवारांची चांगलीच दमछाक होत आहे. राज्यातील तापमानाचा पारा चाळिशीच्या पार झाला आहे. पहिल्या टप्प्यातील सात जागांसाठी अर्ज भरण्याची मुदत संपली आहे. राज्यातील 48 मतदारसंघांत सर्वपक्षीय उमेदवारांच्या प्रचाराचे वातावरण आहे. मात्र, उन्हामुळे प्रचारावर मर्यादा येत आहेत. विदर्भ, मराठवाडा, पश्‍चिम महाराष्ट्र, खानदेश, कोकण आदी सर्व भागांत उष्णतेच्या झळा बसत आहेत. त्यातच ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. 

उमेदवारांनी प्रचाराचे दिवसभराचे नियोजन करताना सकाळी आठ ते दुपारी अकरा व त्यानंतर सायंकाळी चार ते रात्री दहा असा कार्यक्रम ठरविला आहे. यामध्ये शहरी आणि ग्रामीण भागात काही प्रमाणात फरक करण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद आदी शहरांत नोकरदारवर्गाला डोळ्यांसमोर ठेवून प्रचाराच्या वेळा ठरविल्या जात आहेत. सकाळच्या सत्रात घरोघरी संपर्क, रोड शो, शक्तिप्रदर्शन यावर भर देण्यात येत आहे; तर सायंकाळी चार-पाचनंतर कोपरा सभा, गृहनिर्माण सोसायट्यांतील पदयात्रा, मोहल्ला बैठका, भेटी यावर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. उष्णतेचा चटका बसत असल्यामुळे दुपारी दोन ते तीन तास पक्षकार्यालयात बैठका, महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा, फोनच्या माध्यमातून संपर्क, यावर उमेदवार आणि त्यांचे महत्त्वाचे कार्यकर्ते यांनी लक्ष केंद्रित केले आहे. 

पिण्याच्या पाण्याची वानवा 
ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची बहुतांश ठिकाणी वानवा निर्माण झाली आहे. त्यामुळे उमेदवाराबरोबर फिरताना सोबत निघालेले त्या त्या पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सोडवणे, ही उमेदवाराच्या यंत्रणेची प्रमुख जबाबदारी झाली आहे. यासाठी प्रचारात असलेल्या वाहनांत पाण्याच्या बाटल्यांची खोकी सकाळीच सोबत घेण्याच्या सूचना केल्या जात आहेत. तरीही, पिण्याच्या पाण्याची कमतरता जाणवत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

Avinash Jadhav: अविनाश जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल, 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, काय आहे प्रकरण?

Delhi Bomb Threats: दिल्ली बॉम्बच्या धमक्यांचे दक्षिण कोरिया, फ्रान्स कनेक्शन; मेल डोमेन अन् वीपीएनबाबत धक्कादायक माहिती समोर

लग्नामुळे महिलेचे स्वातंत्र्य संपत नाही; तिला स्वतःच्या आवडीनुसार जगण्याचा पूर्ण अधिकार; उच्च न्यायालयाचा निर्वाळा

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी रायबरेलीतून, तर किशोरीलाल शर्मा अमेठीतून निवडणूक लढवणार; काँग्रेसची यादी जाहीर

SCROLL FOR NEXT