Ramdas Athawale Prakash Ambedkar esakal
महाराष्ट्र बातम्या

'वंचित' बरखास्त करून प्रकाश आंबेडकरांनी माझ्यासोबत यावं, अध्यक्षपदासह माझं मंत्रिपद देईन; आठवलेंची खुली ऑफर

आम्हाला ज्या पद्धतीने आरक्षण मिळाले, तसे मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळाले पाहिजे.

सकाळ डिजिटल टीम

'रिपब्लिकन पक्ष देश पातळीवर ‘एनडीए’सोबत आहे. माझ्या पक्षाला लोकसभेसाठी राज्यात दोन जागा देण्यात याव्यात.'

सांगली : आम्हाला ज्या पद्धतीने आरक्षण मिळाले, तसे मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळाले पाहिजे. ज्यांचे उत्पन्न ८ लाखांपेक्षा कमी आहे, त्यांना आरक्षण द्यावे. तमिळनाडूमध्ये वेगवेगळी वर्गवारी करून ६९ टक्के आरक्षण दिले आहे. त्या धर्तीवर मराठा समाजासाठी वेगळी वर्गवारी करून आरक्षण देण्याची गरज आहे, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी येथे व्यक्त केले.

ओबीसी आरक्षणाला (OBC Reservation) धक्का लावू नये, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. सांगलीत शासकीय योजनांच्या अंमलबजावणीबाबत अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री आठवले बोलत होते. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, ही आम्ही पहिली भूमिका मांडली. मराठ्यांना आरक्षण म्हणजे सगळ्यांना आरक्षण असे नाही. ज्यांचे आठ लाखांच्या आत उत्पन्न आहे, अशांना आरक्षण द्यावे.

याबाबत आमचे मंत्रालय विचार करीत आहे. यासाठी एक समिती नेमली होती. त्याचा अहवाल राष्ट्रपतींकडे सादर केला आहे. दोन किंवा तीन वर्गवारीमध्ये हे आरक्षण देण्याची शिफारस केली आहे. मराठा समाजाला मराठा म्हणून आरक्षण मिळत असेल, तरी ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी होत आहे. मात्र, ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता हे दिले पाहिजे.

यावर मार्ग म्हणून तमिळनाडूमध्ये ज्या पद्धतीने आरक्षण दिले, त्या धर्तीवर मराठा समाजाला आरक्षण देण्याचा प्रयत्न करावा. मनोज जरांगे-पाटील यांनी २० जानेवारीला मुंबईला येण्याची गरज नाही, आरक्षण निश्चित मिळेल; परंतु सरकारला काहीसा वेळ द्यावा. आरक्षणावरून छगन भुजबळ आणि मनोज जरांगे-पाटील यांच्यात सुरू असलेला वाद मिटला पाहिजे. दोघांनी एकमेकांवर टीका करून ताकद वाया घालवू नये, असे ते म्हणाले.

राज्यात मंत्रिपद हवे होते

मंत्रिमंडळ विस्तारत आम्हाला न्याय देऊ असे सांगण्यात आले, मात्र अजितदादा येताच त्यांचा विस्तार झाला अन् आमचा रखडल्याची खंतही श्री. आठवले यांनी व्यक्त केली. राज्यात किमान एक मंत्रिपद मिळाले पाहिजे, याबाबतची मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. ऐक्य करायचे असेल तर खालच्या पातळीवर एकत्र आले पाहिजे. गावागावांत एकत्र आहोत का? आपण एका नेत्याच्या पाठीमागे उभे राहतो का? लोक जर एकत्र आले, तर आम्ही ऐक्य करण्यास तयार आहे. इंडिया आघाडीला यश मिळणार नाही, चार पक्षांचे बारा वाजतील, असेही ते म्हणाले.

‘वंचित’ बरखास्त करून सोबत यावे

प्रकाश आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडी बरखास्त करून सोबत यावे. पक्षाच्या अध्यक्षपदासह माझे मंत्रिपद देऊ. रिपब्लिकन पक्ष देश पातळीवर ‘एनडीए’सोबत आहे. माझ्या पक्षाला लोकसभेसाठी राज्यात दोन जागा देण्यात याव्यात. दलित मतांना आकर्षित करण्यासाठी ‘आरपीआय’ला ताकद देण्याची गरज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

European Union Warning: युद्ध थांबले तरी इंधन महागच राहणार; युरोपीय महासंघाचा इशारा, ‘विंडफॉल टॅक्स’ लागू होण्याची शक्यता!

Washim News: फसव्या लिंकमुळे बँक खाती होताहेत रिकामी; सायबर फसवणुकीचे प्रकार वाढले; नागरिकांनी सजग राहण्याची गरज

Chhatrapati Sambhajinagar Student Death : काळाचा घाला! परीक्षा देऊन घरी परतणाऱ्या विद्यार्थ्याला महापालिकेच्या डंपरने चिरडले; जागीच मृत्यू झाल्याने हळहळ

IPL 2026: आधी KL Rahul, आता रिषभ पंत! संजीव गोएंका यांनी पुन्हा कर्णधाराला झापलं? X पोस्ट करत म्हणाले, LSG ची कहाणी...

Jalgaon Accident News: दोन दुचाकींचा अपघात; एक ठार, तिघे जखमी; १ ठार, ३ गंभीर जखमी; पोलिसांनी गुन्हा नोंदवला

SCROLL FOR NEXT