विधानभवन e sakal
महाराष्ट्र बातम्या

पावसाळी अधिवेशन ५ जुलैपासून; 'हे' तीन मुद्दे गाजणार

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : राज्याचे पावसाळी अधिवेशन (maharashtra assembly monsoon session) सोमवार ५ जुलैपासून मुंबईत होणार आहे. विधानसभेची बैठक सकाळी ११ वाजता तर विधान परिषदेची बैठक दुपारी १२ वाजता सुरू होईल. मराठा, ओबीसींसह पदोन्नतीमधील आरक्षणाचे (obc reservation) विषय गाजण्याची शक्यता आहे. (maharashtra assembly monsoon session starts from 5 july in mumbai)

मराठा समाजाला राज्य सरकारने आरक्षण दिले होते. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने ते असंवैधानिक ठरवत रद्द केले. यावरून राज्याचे राजकारण व समाजकारण चांगलेच ढवळून निघाले. मराठा समाजाने आंदोलन करण्याचा इशारा दिला. भाजपही यावरून सरकारवर निशाना साधण्याची संधी सोडताना दिसत नाही. मराठासोबतच ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचाही पेच निर्माण झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण धोक्यात आले आहे. नागपूर, अकोला, वाशीम, धुळे, नंदुरबार व पालघर या सहा जिल्हा परिषदेतील निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षणच नाही तर मागासवर्गीयांच्या पदोन्नतीमधील आरक्षणाचाही प्रश्नही कायम आहे. राज्य सरकारने मागासवर्गीयांसाठी ३३ टक्के पद राखीव न ठेवता सरसकट सेवाज्येष्ठतेच्या आधारे पदोन्नती देण्याचा निर्णय घेतला. यावर मंत्रिमंडळात खडाजंगी झाली. त्यामुळे हे अधिवेशन आरक्षणाच्या नावे राहणार असल्याचे दिसते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: १९९४ चा जीआर नेमका काय आहे? मराठा समाज आरक्षणाबाहेर राहिला, कारण...

BCCI ची अब्जावधींची कमाई होते तरी कशी? भारताच्या तुलनेत पाकिस्तान क्रिकेट बोर्ड किती कमावतो पैसा, जाणून घ्या

Latest Marathi News Updates : गावातील रस्त्याना आले नदीचे स्वरूप

Pune Crime : ‘एनएचएम’ मधील अधिकारी कर्मचाऱ्यांना कोटयावधींचा गंडा; नोकरीत कायम करण्‍याच्‍या नावाखाली उकळले ७५ कोटी

Pakistan admits: मोठी बातमी! अखेर पाकिस्तानला कबूल करावंच लागलं ; 'अमेरिकेच्या मध्यस्थीसाठी कधीच तयार नव्हता भारत'

SCROLL FOR NEXT