महाराष्ट्र

आंध्र पॅटर्नचा अवलंब करण्याचा सरकारचा विचार 

प्रशांत बारसिंग

मुंबई - कर्जबाजारी राज्याच्या महसुली उत्पन्नाच्या तब्बल पन्नास टक्‍के निधी सरकारी कर्मचारी आणि कर्जाच्या व्याजावर खर्च होत असतानाच राज्य सरकारने शेतकऱ्यांना 34 हजार कोटींची कर्जमाफी जाहीर केली आहे. पैशांचा हा ताळमेळ बसविण्यासाठी आंध्र प्रदेश पॅटर्नचा सरकार गांभिर्याने विचार करत असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. येत्या तीन वर्षांत तीन समान हप्त्यांत ही रक्कम व्याजासह बॅंकांना दिली जाईल, म्हणजेच प्रत्येक वर्षी किमान 15 हजार कोटींची सरकारला तरतूद करावी लागेल, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

केंद्राप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनाही सातवा वेतन आयोग लागू करावा लागणार आहे. त्याचा 18 हजार कोटींचा बोजा तिजोरीवर पडणार असल्याने सरकारचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडून पडणार आहे. राज्यावरील कर्जाचा डोंगर वाढतच चालला आहे. या वर्षअखेर 4 लाख कोटींचा टप्पा पार होईल. एकीकडे महसूलवाढीचे स्रोत वाढविण्यासाठी अर्थमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली आहे. महसुलात वाढ करण्यासाठी सरकार अनेक पर्यायांचा अभ्यास करत असले, तरी त्यात अद्याप प्रगती झालेली नाही. दुसरीकडे 1 जुलै 2017 पासून राज्यात जीएसटी लागू होत आहे. केंद्राच्या निर्णयामुळे एलबीटीची नुकसानभरपाईही मिळणार नाही. त्यामुळे मुंबईची जकात आणि अन्य 26 महापालिकांसाठी तब्बल 15 ते 16 हजार कोटींचे अनुदान राज्याच्या तिजोरीतूनच द्यावे लागणार आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांची 34 हजार कोटींची कर्जमाफी दिली आहे. हा निधी सरकार बॅंकांना देणार आहे. मात्र, रक्कम मोठी असल्याने आंध्र प्रदेशच्या पॅटर्नचा सरकार विचार करत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT