महाराष्ट्र

'सामान्यांपर्यंत योजना पोचवण्यासाठी युवक केंद्रबिंदू'

सकाळवृत्तसेवा

मुंबई - सरकारतर्फे राबवण्यात येणाऱ्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोचवण्यासाठी युवक संपर्क केंद्रबिंदू ठरेल, असे मत गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी व्यक्त केले. सरकारने युवकांना प्राधान्य देण्यासाठी लक्ष्य दिले पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. ‘यिन’ आयोजित नेतृत्व विकास परिषदेच्या शेवटच्या दिवशी पाटील यांनी यिन मंत्रिमंडळातील सदस्यांशी संवाद साधला. 

आपण कॉलेजमधून बाहेर पडल्यानंतर बंद झालेल्या निवडणुकांना ‘सकाळ’ने यिनच्या माध्यमातून जिवंत ठेवले, असे कौतुकोद्‌गार या वेळी पाटील यांनी काढले. ते म्हणाले, की विद्यार्थ्यांमधील नेतृत्वगुण आणि कौशल्य वाढवण्याचे महत्त्वाचे काम यिन करत आहे. नोकऱ्यांअभावी आत्महत्येचा मार्ग पत्करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांनी कौशल्य विकासाकडे लक्ष देण्याची गरज आहे. सरकार फक्त सेवा देऊन थांबलेले नाही; तर सेवा हमी कायदा सरकारने सामान्यांसाठी आणला आहे. सध्या सरकारकडून राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांमध्ये टाटा, दमानिया, रिलायन्स आदी उद्योजक सीआरएस फंडाच्या माध्यमातून सहभागी होत आहेत. या कंपन्यांकडून सरकारच्या योजनांसाठी दातृत्व दाखवले जात आहे. जलयुक्त शिवारसारख्या योजनेत अनेकांनी मोठ्या रकमेची मदत केली. टाटासारख्या उद्योजकांकडून सरकारने अनेक औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये व्हर्च्युअल क्‍लासरूम तयार करून घेतले. मारुती कंपनीसोबत सरकारने कामगार पुरवठा करण्याचा करार केला असून हजारो कामगार पाठवून दिले जाणार आहेत, अशी माहिती पाटील यांनी दिली. 

‘सकाळ’सोबतही केंद्र सरकारने करार केला असून विविध मशीनचे ज्ञान शेतकऱ्यांना देण्याचे काम सकाळ समूह करणार आहे, असेही या वेळी पाटील यांनी सांगितले. 

प्रपंचाप्रमाणे परमार्थ गाठा, प्रामाणिकपणे केलेल्या कामामुळे राज्यासह देशाचा विकास होतो. यासाठी जास्तीत जास्त युवकांनी पुढे येण्याची गरज आहे.
- रणजित पाटील, गृहराज्यमंत्री

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान मोदी सोलापुरात दाखल; थोड्याच वेळात होणार सभा

Wagholi Crime News : अष्टविनायक महामार्गावर अपघात; तिघांचा उपचारा दरम्यान मध्यरात्री मृत्यु

Team India squad T20 WC24 : आज हार्दिक पांड्याचा लागणार निकाल; टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची होणार घोषणा, 'ही' 9 नावे निश्चित

Lok Sabha Election: पुन्हा सूरत पॅटर्न! शेवटच्या दिवशी काँग्रेस उमेदवाराने अर्ज मागे घेत केला भाजप प्रवेश..काय आहे प्रकरण?

Champions Trophy 2025 : जागा ठरली! पाकिस्तानने केली मोठी घोषणा; PCBच्या निर्णयानंतर BCCI उचलणार मोठं पाऊल?

SCROLL FOR NEXT