Maharashtra Politics Devendra Fadnavis statement on political affairs Chanakya has to find Chandragupta mumbai e sakal
महाराष्ट्र बातम्या

चाणक्याला चंद्रगुप्त शोधावाच लागतो - देवेंद्र फडणवीस

राजकीय उलथापालथीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाष्य

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : ‘‘मी कुणाला उपमा देत नाही, पण जेव्हा जेव्हा धनानंदाची सत्ता निरंकुश होते, तेव्हा कोणाला तरी चाणक्य बनून चंद्रगुप्त शोधावा लागतो आणि ती व्यवस्था उद्ध्वस्त करावी लागते, ’’ असे भाष्य करत काही दिवसांतील राजकीय घडामोडींवरील मौन सोडत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील राजकीय उलथापालथीचे आपणच चाणक्य असल्याचे सूतोवाच केले.

विधानसभेत सोमवारी विश्वासदर्शक ठराव मंजूर झाल्यावर मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या अभिनंदन प्रस्तावावर फडणवीस हे बोलत होते. शिवसेनेत झालेल्या बंडाळीचे जोरदार समर्थन करत शिंदे यांच्या पाठीशी खंबीर उभा राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांनी, नेत्यांच्या उपलब्धतेचा अनुशेष महाराष्ट्रात निर्माण झाला होता, ती कसर आता भरून निघेल असा टोला त्यांनी ठाकरेंना आणि शिंदे यांच्यावर विश्वास व्यक्त केला.

टिंगल करणाऱ्यांना माफ केले

‘‘ज्यांनी माझी टिंगलटवाळी केली, त्यांना मी माफ केले आहे. त्यांना माफ करणे हाच त्यांचा बदला आहे महाराष्ट्राचे राजकारण वेगळे आहे. कुणी किती मोठे विरोधक असले तरी आपण एकमेकांकडे जातो. हे राजकारण असेच असले पाहिजे. सत्तेचा अहंकार डोक्यात जाऊन उपयोग नसतो. मध्यंतरीच्या काळात अनेक दुर्दैवी घटना महाराष्ट्राने अनुभवल्या. मी नशीबवान आहे की माझे मुंबईत घर नाही. त्यामुळे माझे घर तुटले नाही आणि सरकारविरुद्ध आवाज उठवू शकलो, असे टोलेदेखील फडणवीस यांनी हाणले.

सत्ता उलथवण्याचे स्पष्टीकरण

सत्ता हे आमच्यासाठी केवळ साधन आहे. आमची खंत एकच होती, की जनादेश मिळूनही एक विचित्र आघाडी जन्माला घातली गेली. जनतेचा अपमान केला गेला त्यामुळेच हे सरकार अशा पद्धतीने उलथवण्यात आल्याचे स्पष्टीकरणही त्यांनी दिले.

मुख्यमंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव

  • एकनाथ शिंदे यांनी आपले आयुष्य उभे केले.

  • वयाच्या ५६ व्या वर्षी त्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले. हा निर्धार मोलाचा आहे.

  • नंदुरबारहून मोर्चा निघाला तर त्यावेळी आमच्या इतर नेत्यांसोबत एकनाथ शिंदे मोर्चेकऱ्यांच्या व्यवस्थेसाठी धावले

  • शिंदे यांनी सीमाप्रश्नावर आंदोलन केले. त्यामुळे ४० दिवस ते बेलारीच्या तुरुंगात होते. त्यातून त्यांच्या नेतृत्वाचा दबदबा तयार झाला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gariaband Encounter: सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक; १० नक्षलवादी ठार, १ कोटींचं बक्षीस असणाऱ्या कमांडरचाही मृत्यू

OBC Reservation: ''ओबीसींचं आरक्षणच संपलं..'', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत दिला जीव

Rahul Gandhi security issue : ‘’राहुल गांधींकडून नऊ महिन्यात सहा परदेश दौऱ्यात सुरक्षा प्रोटोकॉलचे उल्लंघन’’ ; 'CRPF’चं खर्गेंना पत्र!

Sachin Tendulkar: सचिन तेंडुलकर खरंच BCCI चा अध्यक्ष होणार का? मास्टर ब्लास्टरची टीम म्हणते, तुम्ही जे ऐकलं आहे ते...

Latest Marathi News Updates Live : वेरूळ घाटात टँकर पलटी होऊन दोन निष्पाप जीवांचा अंत

SCROLL FOR NEXT