राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढली esakal
महाराष्ट्र बातम्या

राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढली

राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील शाळा सुरू झाल्यानंतर आता या शाळांमध्ये उपस्थितीचे प्रमाण वाढत आहे

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : शालेय शिक्षण विभागाने ४ ऑक्टोबरपासून राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील शाळा सुरू झाल्यानंतर आता या शाळांमध्ये उपस्थितीचे प्रमाण वाढत आहे. मागील चार दिवसानंतर शुक्रवारी(ता.८) ५९.४८ टक्के विद्यार्थ्यांनी शाळेत हजेरी लावली असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली.

राज्यात शहरी भागात आठवी ते बारावी आणि ग्रामीण भागात पाचवी बारावीपर्यंत च्या शाळा सुरू झाल्या आहेत. यात शाळेच्या पहिल्या दिवशी राज्याच्या ग्रामीण भागात विद्यार्थी उपस्थितीचे प्रमाण ५१.१७ टक्के होते. गेल्या चार दिवसांत विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती वाढली असून शुक्रवारी ५९.४८ टक्के विद्यार्थ्यांनी शाळेत हजेरी लावली. शहरी भागातही विद्यार्थी उपस्थितीचे प्रमाण ३४.९० टक्क्यांवरून ४६.३६ टक्क्यांवर पोहोचले आहे.

दरम्यान, मुंबई विभागातील शाळा, महाविद्यालयात विद्यार्थी उपस्थिती सर्वात कमी नोंदविली गेली. मुंबई, ठाणे, पालघर, रायगडमध्ये आठवी ते बारावीच्या ४ हजार २०७ शाळा असून ११ लाख ४२ हजार १८१ विद्यार्थी आहेत यातील ३ हजार ४६४ शाळा सुरू झाल्या असून ४ लाख ११ हजार ३८ विद्यार्थी उपस्थित होते.

राज्यात सर्वत्र शाळा सुरू झाल्याने पालकांमध्ये एक मोठ्या प्रमाणात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्यात पाचवी ते बारावीच्या ४३,०३० शाळा असून आठवी ते बारावीच्या १२, ४८८ शाळा, ज्युनियर काँलेज आहे. यात ५८ लाख ६५ हजार ७०३ विद्यार्थी असून ३२ लाख ८२ हजार १४८ विद्यार्थी आठवी ते बारावीचे आहेत.

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदने दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी ८ ऑक्टोबरला यातील पांचवी ते आठवीच्या ४० हजार ७७७ (९४.७६ टक्के) शाळा कनिष्ठ महाविद्यालय सुरू झाली आहेत. यामध्ये ३४ लाख ,८८ हजार ६३१(५९.४८ टक्के) विद्यार्थी उपस्थित होते. तर आठवी ते बारावीचे १५ लाख २१ हजार ७३९ विद्यार्थ्यांनी शाळेत हजेरी लावली असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Goodluck Cafe Viral Video: पुण्यातील गुडलक कॅफेत बन मस्कामध्ये काचेचा तुकडा; खवय्यांमध्ये संताप, व्हिडिओ व्हायरल

टोमणे सहन न झाल्याने टेनिसपट्टू राधिकावर बापानेच झाडल्या गोळ्या; पोलिस तपासात धक्कादायक बाबी उघड, नेमकं काय घडलं?

PG Medical Courses: आरोग्य विद्यापीठाचे पीजी प्रवेश सुरू; तीन अभ्यासक्रमांच्या प्रवेश अर्जासाठी १३ जुलैपर्यंत मुदत

Space Technology Agriculture: स्पेस टेक्नोलॉजीमुळे शेतीत होईल क्रांती! इस्रो शिकवणार उपग्रहांचा शेतीमध्ये उपयोग, आजच करा अर्ज!

संगमनेर हादरलं! 'भूमिगत गटारात गुदमरून दोन कामगारांचा मृत्यू'; ठेकेदाराचा निष्काळजीपणा जबाबदार, नेमकं काय घडलं..

SCROLL FOR NEXT