Gaurav-Vallabh
Gaurav-Vallabh 
महाराष्ट्र

‘मेक इन इंडिया’त फक्त कुलपांचे उत्पादन वाढले - प्रा. वल्लभ

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई - ‘मेक इन इंडिया’च्या गप्पा मारणाऱ्या  भाजप सरकारच्या काळात फक्त कुलूप बनवणाऱ्या कंपन्यांचे उत्पादन वाढल्याचे दिसत आहे, अशी टीका काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रा. गौरव वल्लभ यांनी केली.

गांधी भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना प्रा. वल्लभ यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या आर्थिक धोरणांचा समाचार घेतला ते म्हणाले की, उद्योगांना मंदीचा मोठा फटका बसला आहे. पण केंद्र सरकार मंदीवर काही न बोलता पाच ट्रिलियन अर्थव्यवस्थेच्या बाता मारत आहे. पण ही अर्थव्यवस्था कशी तयार होईल हे मात्र सांगत नाहीत. या सरकारचे आर्थिक नियोजन पूर्णपणे कोलमडले असून अर्थमंत्री दर आठवड्याला अर्थसंकल्पातील तरतुदींमध्ये बदल करत आहेत. सरकारचे हे प्रयत्न म्हणजे कर्करोगावर बाम लावण्यासारखे आहे, अशी टिका त्यांनी केली. 

‘मेक इन महाराष्ट्र’ कार्यक्रमातून ३० लाख नवीन रोजगार देऊ असे सरकारने सांगितले होते, पण सरकार किती रोजगार निर्माण झाले ते सांगत नाही. सरकारने केलेल्या दाव्यानुसार राज्यात ७३ लाख नवीन रोजगारांची निर्मिती व्हायला हवी होती. पण नवीन रोजगार निर्मिती होण्याऐवजी असलेले रोजगार जात आहेत, असा आरोप प्रा. गौरव यांनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Squad for T20 WC: केएल राहुलची टी20 कारकीर्द संपुष्टात? 'या' पाच खेळाडूंचीही संधी हुकली

Arvind Kejriwal: केजरीवालांना निवडणुकीपूर्वीच अटक का केली? सुप्रीम कोर्टानं ईडीकडून मागवलं उत्तर

Vishal Patil: विश्वजीत कदमच आमचे नेते त्यांना मुख्यमंत्री करणारच, विशाल पाटलांनी सांगितला विजयानंतरचा प्लॅन

Amit Shah Fake Video Case : अमित शाह फेक व्हिडीओ प्रकरणात १६ नेत्यांना नोटीस, सात राज्यांमध्ये पोलिस पोहोचले

Shahrukh Khan : शाहरुखवर अबराम भडकला ; सोशल मीडियावर व्हिडीओ चर्चेत

SCROLL FOR NEXT