Manoj Jarange esakal
महाराष्ट्र बातम्या

Manoj Jarange : EWSच्या जाहिरातीवरुन मनोज जरांगे आक्रमक; घेतली ठोस भूमिका

संतोष कानडे

अंतरवाली (जालना): मराठा समाजाला आरक्षण देण्यासंबंधीचा वेळ दोन दिवसांनी संपत आहे. सरकारने ठरवलं तर दोन दिवसांमध्ये आरक्षण देता येईल, अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे सरकारने रविवारी काढलेल्या ईडब्ल्यूएसच्या जाहिरातीवरुनही त्यांनी टीकास्र सोडलं.

अंतरवाली येथे एक बैठक आयोजित करण्यात आलेली होती. या बैठकीनंतर मनोज जरांगे यांची एक पत्रकार परिषद होणार आहे. बैठकीमध्ये बोलताना जरांगे म्हणाले की, मराठा आरक्षणासाठी कायदा मंजूर करण्यासाठी समितीला पुरावे मिळालेले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देता येतं.

''माळी बांधवांचा आणि मराठा समाजाच्या व्यवसायात फरक काय? त्यामुळे मराठा समाजाला सहजपणे आरक्षण देता येतं. अशा पंधरा जाती आहेत, त्यांचा व्यवसाय शेती आहे म्हणून त्यांना ओबीसी आरक्षण दिलं. त्यामुळे मराठा समाजाला शिंदे साहेबांनी गठीत केलेल्या समितीने दोन दिवसात अहवाल द्यावा आणि मराठा समाजाला आरक्षण देऊन विषय मार्गी लावावा.''

जरांगे पुढे म्हणाले की, यापुढे समितीने वेळ मागू नये आणि सरकारनेही वेळ देऊ नये. कारण आधारासाठी पुरावे खूप झालेले आहेत. राजकीय इच्छाशक्ती असेल तर पुराव्यांचीही आवश्यकता नाही. आजही मराठा समाज शांत आणि पुढेही शांत राहणार आहे. दोन दिवसांत मराठा समाजाला आरक्षणाच्या माध्यमातून न्याय द्यावा. तुमच्याकडे कुठलीच कमतरता नाही, जे समितीने केलं ते भरपूर आहे. आता समितीला काम करायला लावू नका आणि वेळकाढूपणा करु नका. पश्चिम महाराष्ट्रातले मराठेसुद्धा लाखांमध्ये सोबत आलेले आहेत.

EWS आरक्षणाबाबत सरकारने काढलेल्या जाहिरातीबद्दल बोलताना जरांगे म्हणाले की, ईडब्ल्यूएस आरक्षण कुणी मागितलं होतं? बाकीच्यांनाही सारथीसारख्या संस्था आहेत. मग मराठ्यांना वेगळं काय सांगता? मराठ्यांचा आरक्षणाचा विषय आला की ईडब्ल्यूएसचा मुद्दा काढला जातो, मात्र या आरक्षणाचा फायदा सर्वांनाच होतो, आमची मागणी मराठा समाजाबद्दलची आहे.

''मराठे आता हुशार झाले आहेत, त्यामुळे आरक्षण टाका म्हणतात नाहीतर आवाज करायचा नाही म्हणतात. त्यामुळे सरकारने जे काही करायचं आहे ते दोन दिवसांमध्ये करावं. नाहीतर पुढची परिस्थिती अवघड होईल. आमचं आंदोलन सरकारला झेपणारही नाही आणि पेलवणारही नाही. जे कायद्यात आहे तेच आम्ही मागत आहोत'' असं म्हणत जरांगेंनी पुन्हा एकदा सरकारला इशारा दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT