महाराष्ट्र

साखर निर्यातीसाठी लवकरच धोरण 

सकाळवृत्तसेवा

बारामती - भारतातील साखर उद्योगात उद्‌भवलेल्या अभूतपूर्व समस्येसंदर्भात "इस्मा'च्या पदाधिकाऱ्यांची पंतप्रधान कार्यालयात नुकतीच उच्चस्तरीय बैठक झाली. या वेळी झालेल्या चर्चेत सरकारच्या वतीने आयात शुल्क 100 टक्के करण्यास व अतिरिक्त उत्पादित साखर निर्यातीसाठी सरकार लवकरच धोरण जाहीर करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. दुसरीकडे साखर कारखान्यांनीही उत्पादन खर्चापेक्षा कमी किमतीत साखर विकण्याची घाई करू नये, असे आवाहनही या चर्चेदरम्यान सरकारी सूत्रांनी केले. 

"इंडियन शुगर मिल्स असोसिएशन'चे (इस्मा) अध्यक्ष गौरव गोयल, उपाध्यक्ष रोहित पवार, महासंचालक अविनाश वर्मा यांच्या शिष्टमंडळाची गेल्या आठवड्याच दिल्लीत पंतप्रधान कार्यालयात उच्चस्तरीय अधिकाऱ्यांसमवेत बैठक झाली. गेल्या महिन्याभरातील ही चौथी बैठक होती. या बैठकीत सरकारी सूत्रांनीही आगामी सरकारी धोरणांबाबत पदाधिकाऱ्यांना माहिती दिली. या वेळी पदाधिकाऱ्यांनी साखरेचा उत्पादन खर्च 3300 रुपये प्रतिक्विंटल असताना साखर आता 2800 रुपयांवर घसरली असल्याचे निदर्शनास आणून दिले. या परिस्थितीमुळे देशात "एफआरपी'पेक्षा अधिक दर जाहीर केलेल्या कारखान्यांची पंचाईत झाली असून, अनेक कारखान्यांना "एफआरपी'एवढी रक्कम देणेही अडचणीचे झाल्याचे स्पष्ट केले. परिस्थिती खूप वाईट असून, उत्तर प्रदेशात ऊस खरेदीतील 3800 कोटींची देणी थकली असल्याचेही त्यांनी सांगितले. 

या बैठकीविषयी "इस्मा'चे उपाध्यक्ष रोहित पवार यांनी "सकाळ'ला माहिती दिली. ते म्हणाले,""आम्ही महाराष्ट्रातील स्थिती समोर आणली, तेव्हा उत्पादन खर्चापेक्षा कमी दराने साखर विकू नका व विकण्याची घाई करू नका, जेवढी साखर ज्या दरात विकणे योग्य आहे, तेवढीच विकावी, असाही सल्ला वरिष्ठ पातळीवरून दिला असून, येत्या काही दिवसांत आयात शुल्कात 100 टक्‍क्‍यांपर्यंत वाढ करण्याचे व निर्यातीसाठी प्रोत्साहनाचे धोरण आखण्याचा सरकार निर्णय घेईल, असे आश्वासन दिले आहे. गेल्या तीन महिन्यांत साखरेचे दर प्रतिक्विंटल 600 रुपयांपेक्षा अधिक घसरले असून, कारखान्यांची अवस्था अत्यंत अडचणीची बनली आहे. या स्थितीतून मार्ग काढण्यासाठी आम्ही सरकारला विनंती केली आहे. त्यावर सरकारने ठोस उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे.'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT