श्रीमती हौसाक्का पाटील
श्रीमती हौसाक्का पाटील  sakal
महाराष्ट्र

जन चळवळींच्या आधारवड

दिपक पवार

क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या कन्या व शेकापच्या ज्येष्ठ नेत्या श्रीमती हौसाक्का पाटील यांचे आज निधन झाले. त्यांच्‍या स्मृतींना शेकापचे ज्येष्ठ नेते संपतराव पवार यांनी दिलेला उजाळा.

तो काळ होता १९५६ चा. देशाला स्वातंत्र्य मिळवून जेमतेम आठ-दहा वर्षे झालेली. त्याच दरम्यान राज्यात संयुक्त महाराष्ट्र चळवळीने जोम धरला होता. माझे वडील स्वातंत्र्य सैनिक गोविंदराव पवार शेकापचे लढवय्ये कार्यकर्ते होते. हौसाक्का या क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कन्या. नाना पाटील यांच्याप्रमाणे त्या लोकलढ्यात सहभागी होत होत्या‌. त्यांचे ते पहिले दर्शन मला प्रेरणा देणारे ठरले.

शेकापच्या जिल्ह्यातील सर्व आंदोलनाचा त्या धागा होत्या. त्यांच्या सोबत अशा अनेक आंदोलनाचे मला साक्षीदार होता आले. १९६५ च्या शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने दुष्काळ, पाणी याविषयावर लोकलढे सुरु होते. त्यावेळी महाराष्ट्रातील पहिली चारा छावणी खानापूर तालुक्यातील पारे उभी राहिली. त्यासाठी मोठे आंदोलन झाले. त्यांचेच त्या लढ्याला नेतृत्व होते. शक्य तेव्हा त्या आघाडीवर येत आंदोलनात सहभागी झाल्या. जनावरांची चाऱ्या विना होणारी तडफड त्यांच्या संवेदनशील मनाला पाहवत नव्हती. त्यासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष केला. खानापूर तालुक्यात त्यांच्या नेतृत्वाखाली किती आंदोलने केली याची गणती नाही.

आंदोलनाचे त्यांना बाळकडूच होते. माझ्यावर त्यांनी मुलाप्रमाणे माया केली. आजन्म आपुलकी दिली. मला त्यांचे घर नेहमीच हक्काचे राहिले. महिलांच्या प्रश्नासाठी मुक्ती संघर्ष चळवळीने आंदोलन केले. १९८२ च्या दरम्यान , मुंबईत गिरणी कामगारांचा संप झाला. परिणामी , मुंबईत दुष्काळी भागातील असणारे लोक गावाकडे परतली. इथं आल्यानंतर त्यांच्या हक्कासाठी आंदोलने केली. येरळा नदीवर लोकसहभागातून उभारलेल्या बळिराजा धरणाच्या निर्मितीत त्या सहभागी राहिल्या. राज्यभरातील शेकाप परिवारातील त्या माऊली होत्या. कार्यकर्त्यांना त्यांनी सतत लढण्यासाठी बळ दिले.

अगदी अलीकडे म्हणजे २००३ साली तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती उद्भवली. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी , जनावरांनासाठी चारा छावणी सुरू करावी, यासाठी तहसीलदार कचेरीच्या दरात आमची स्वत : ची जनावरे बांधली. त्याचा प्रारंभ त्यांच्या हस्ते केला. पुढं १०३ दिवस धरणे चालले. अखेर प्रशासनाला नमते घेत चारा छावणी सुरू करावी लागली. अशी किती आंदोलने सांगावीत. एक पर्व संपले.

३० एप्रिल २०१२ रोजी विटा येथील नुतन प्रशासकीय इमारतीच्या उदघाटन होते. पालकमंत्री पतंगराव कदम व बाळासाहेब थोरात उपस्थित होते. तालुक्यात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न, दुष्काळाचा प्रश्‍न मोठा होता. या प्रश्नाकडे शासन दुर्लक्ष करतेय अशी भावना झालेल्या हौसाक्कांनी थेट पतंगरावांची गाडी भर उन्हात रोखली. ‘लोक दुष्काळात होरपळत असताना कसली उद्घाटन करता अशा शब्दात त्यांनी पतंगरावांना जाब विचारला. त्यांचा तो रूद्रावतार पाहताच पतंगराव तडक गाडीतून उतरले. म्हणाले,‘‘ मावशी तुला मला बोलायचा अधिकार आहे. सगळ्या प्रश्‍नांची माझी जबाबदारी आहे.’ पतंगरावांनी त्यांना घेऊनच इमारतीच्या उद्घाटनाची फित कापली‌. व्यासपीठारून त्या म्हणाल्या, ‘या वयात मला कशाला लढायला लावताय. तुम्ही आमचीचं पोरं हायसा म्हणून बोललो.’

(शब्दांकन ः दिपक पवार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautam Gambhir: 'KKR जिंकल्यावर गंभीरचे कौतुक अन् हरल्यावर श्रेयसची चूक?' दिग्गज क्रिकेटरच्या पोस्टने उडवली खळबळ

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

SCROLL FOR NEXT