महाराष्ट्र

शेतकऱ्यांना संपवण्याचे सरकारचे धोरण - शरद पवार

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई - शेतकरी संपावर जाणे, ही इतिहासातली अभूतपूर्व घटना असून, सरकारसाठी मात्र नामुष्कीची आहे. शेतकऱ्यांना संपवण्याचेच या सरकारचे धोरण असल्याने शेतकरी संपावर गेले आहेत, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे त्यांनी ही भूमिका मांडली आहे.

निवडणुकीच्या अगोदर या सरकारने स्वामिनाथन आयोग लागू करण्याचे आश्‍वासन दिले. उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांनी सरकार येताच कर्जमाफी केली. महाराष्ट्रात मात्र शेतकऱ्यांच्या हिताचा कोणताही निर्णय अथवा धोरण होत नसल्याने शेतकरी व्यथित झाला. यामधूनच संपावर जाण्याचे पाऊल शेतकऱ्यांनी उचलले आहे. मात्र, केवळ अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन सरकार शेतकऱ्यांमधे फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप पवार यांनी केला.

शेतकऱ्यांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहावे, असे आवाहन करतानाच फळे, भाजी व दुधाची नासाडी करू नये. याबाबत वेगळ्या पद्धतीने भूमिका घेत दूध, भाजी व फळे गावातील गरिबांना वाटून त्यांच्याशी नाळ घट्ट करावी, असे आवाहनही पवार यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Lok Sabha Ground Report: राम सातपुतेंना धक्का बसणार की प्रणिती शिंदेंना? वंचित गेम चेंजर ठरणार...ग्राऊंड रिपोर्ट वाचा...

IPL Revenue: IPLचे भविष्य संकटात! संघांच्या कमाईत झाली मोठी घसरण; काय आहे कारण?

जे कुटुंबाला सांभाळू शकत नाहीत ते महाराष्ट्राला काय सांभाळणार?; PM मोदींची पवारांवर कडवट टीका

Bhima Koregaon Case: भीमा कोरेगाव प्रकरणात ट्विस्ट, दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक हनी बाबू यांनी मागे घेतला जामीन अर्ज

Bollywood News: व्हॅनिटी व्हॅन, स्टायलिस्ट अन् भरमसाठ फी! फिल्मस्टारवर एका दिवसाला किती पैसे होतात खर्च? वाचून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT