Prakash-Ambedkar
Prakash-Ambedkar 
महाराष्ट्र

भिडेंना अटक करण्याची सरकारची इच्छाशक्ती नाही - प्रकाश आंबेडकर

सकाळवृत्तसेवा

मुंबई - कोरेगाव भीमामधील हिंसाचाराप्रकरणी मिलिंद एकबोटे यांना अटक झाली आहे; पण या प्रकरणातील दुसरे सूत्रधार संभाजी भिडे अजूनही बाहेर आहेत. हे पचनी पडत नाही. त्यांना अटक करण्याची सरकारची इच्छाशक्ती नसल्याचा आरोप भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला.

गुन्हा नोंदवल्यानंतर आरोपपत्र दाखल झालेल्या व्यक्तीला चौकशीला बोलावणे बंधनकारक असते; मात्र भिडे यांना चौकशीला बोलावले गेले नाही, अशी टीकाही त्यांनी केली. भिडे यांना अटक झाल्यास वातावरणातील तणाव निवळेल. त्यांच्या अटकेच्या मागणीसाठी निघणारा माझा मोर्चा अडवल्यास राज्यभर 144 कलम लागू करावे लागेल, असेही ते म्हणाले.

"ऍट्रॉसिटी'बाबतचा निर्णय दुर्दैवी
ऍट्रॉसिटीबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल दुर्दैवी असून, या निर्णयाचा पुनर्विचार व्हावा, अशी मागणी आंबेडकर यांनी केली. या निर्णयामुळे संबंधितांना अभय देण्याचे काम न्यायालयाने केले आहे. असे निर्णय झाल्यास लोकांचा न्यायालयावरील विश्‍वास कमी होईल. हा मुद्दा "लार्जर बेंच'पुढे न्यायला हवा, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amethi Congress Office: अमेठीत राडा, काँग्रेस कार्यालयाबाहेरील अनेक वाहनांची तोडफोड; भाजपवर आरोप

Poonch Attack 2024: पुंछ हल्ल्यामागे पाकिस्तानची संघटनेचा हात, तीन ते चार दहशतवाद्यांनी...

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 06 मे 2024

Women’s T20 World Cup: स्कॉटलँडने रचला इतिहास, वर्ल्ड कपचं पहिल्यांदाच मिळवलं तिकीट; श्रीलंकाही ठरले पात्र

Sharad Pawar : बारामतीकरांना धक्का अशक्य;निवडणुकीची अमेरिकेतही उत्सुकता

SCROLL FOR NEXT