महाराष्ट्र

"ई-पॉज'द्वारे धान्य वाटपाची कार्यवाही त्वरित पूर्ण करा 

सकाळवृत्तसेवा

मुंबई - सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे संगणकीकरण करून सर्व रास्त भाव धान्य दुकानांत ई-पॉज यंत्रणेद्वारे धान्य वाटप करण्याची कार्यवाही पूर्ण करावी. अन्न व नागरी पुरवठा विभागाचा सर्व डाटा साठवण्यासाठी क्‍लाऊड कॉम्प्युटिंगचा वापर करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (ता. 28) दिले. 

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाची आढावा बैठक बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यांनी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेतला. या वेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट उपस्थित होते. सार्वजनिक वितरण प्रणालीचे संगणकीकरण करताना आतापर्यंत 1 कोटी 47 लाख शिधापत्रिकांपैकी 1 कोटी 16 लाख शिधापत्रिकांचे आधार कार्ड लिंक झाले आहेत. उर्वरित शिधापत्रिकांची प्रक्रिया लवकरच पूर्ण करावी. सर्वच योजनांसाठी आधार सिडिंगचा वापर करण्याबाबत विचार करण्यात यावा, अशी सूचनाही या वेळी मुख्यमंत्र्यांनी केली. ई-पॉज यंत्रणा नसलेल्या धान्य दुकानांमध्ये तातडीने ही यंत्रणा बसवावी, असेही ते म्हणाले. 

विदर्भ व मराठवाड्यातील 14 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना अन्न सुरक्षा योजनेद्वारे अन्नधान्य वाटप केले जात आहे. या योजनेपासून दूर असलेल्या शेतकऱ्यांनाही लवकरच समाविष्ट करावे. त्यांच्या शिधापत्रिकाही आधार कार्डशी लिंक कराव्यात, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान मोदी सोलापुरात दाखल; थोड्याच वेळात होणार सभा

Wagholi Crime News : अष्टविनायक महामार्गावर अपघात; तिघांचा उपचारा दरम्यान मध्यरात्री मृत्यु

Team India squad T20 WC24 : आज हार्दिक पांड्याचा लागणार निकाल; टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची होणार घोषणा, 'ही' 9 नावे निश्चित

Lok Sabha Election: पुन्हा सूरत पॅटर्न! शेवटच्या दिवशी काँग्रेस उमेदवाराने अर्ज मागे घेत केला भाजप प्रवेश..काय आहे प्रकरण?

Champions Trophy 2025 : जागा ठरली! पाकिस्तानने केली मोठी घोषणा; PCBच्या निर्णयानंतर BCCI उचलणार मोठं पाऊल?

SCROLL FOR NEXT