Jayant Patil Esakal
महाराष्ट्र बातम्या

जयंत पाटलांनी 'या' मुद्द्यावरून सरकारला धरलं धारेवर; म्हणाले, 'सत्ताधाऱ्यांना झुकवल्याशिवाय शांत बसणार नाही'

शेतकरी आत्महत्येच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारला (Maharashtra Government) टार्गेट केले.

सकाळ डिजिटल टीम

यवतमाळ जिल्ह्यातील तरुण शेतकऱ्याने विधानभवनाच्या प्रवेशद्वाराशी विष पिऊन स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला.

सांगली : शेतकरी आत्महत्येच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारला (Maharashtra Government) टार्गेट केले आहे. चहूबाजूने शेतकरी बांधव संकटात सापडला आहे. त्यांना सहाय्य करण्याऐवजी त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे. सरकारचा तोल ढासळल्याचे हे लक्षण आहे, अशी टीका जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केली आहे.

जयंत पाटील यांनी ‘एक्स हँडल’वरून सरकारवर टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे, की यवतमाळ जिल्ह्यातील तरुण शेतकऱ्याने विधानभवनाच्या प्रवेशद्वाराशी विष पिऊन स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला. शेतमालाला भाव नाही म्हणून आत्महत्या करत असल्याची आर्तता त्याच्या आवाजात होती. दुर्दैव म्हणजे सगळा प्रकार दाबण्याचा प्रयत्न केला गेला.

चहूबाजूने शेतकरी संकटात सापडला आहे. त्यांना सहाय्य करण्याऐवजी आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे. सरकारचा तोल ढासळल्याचे हे लक्षण आहे. शेतकरी बांधवांना विनंती आहे, की हार मानू नका. सत्ताधाऱ्यांना झुकवल्याशिवाय शांत बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: एकापेक्षा जास्त घरे घेणाऱ्यांना चाप बसणार, प्रशासन थेट कारवाई करणार; सरकारी योजनेतील घरांसाठी नवा नियम

Beed : १० वर्षांपासून फरार पण, प्रचारसभांमध्ये सहभाग; अखेर शिवसेनेच्या बड्या नेत्याला बीडमधून उचललं

नाना पाटेकर गावात एकटे राहतात तरी कसे? म्हणाले- फार्महाउसवर गाय- बैल आहेत, सकाळचा नाश्ता झाला की...

पुढील ५ वर्षांत तू स्वतःला कुठे पाहतोस? अर्जुन तेंडुलकरचं प्रांजळ उत्तर... सचिनसोबतच्या तुलनेवर म्हणाला, मला कोणाला काही सिद्ध करून दाखवण्याची गरज नाही

तिरछी टोपी वाले या गाण्यामुळे रातोरात प्रसिद्ध झालेली ती अभिनेत्री झाली अचानक गायब ; सध्या काय करते ?

SCROLL FOR NEXT