महाराष्ट्र बातम्या

Uddhav Thackeray : ...तेव्हा उद्धव ठाकरेंनी घाई केली नसती तर आज 'हे' चित्र नसतं; भूजबळांचं मोठं विधान

सकाळ डिजिटल टीम

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भूजबळ यांनी आज उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याबाबत मोठं विधान केलं आहे. तेव्हा त्यांनी घाई केली नसती तर आज वेगळं चित्र राहिलं असतं ते म्हणाले.

छगन भूजबळ म्हणाले की, सध्या राज्यभरातून उद्धव ठाकरे यांच्यामागे सहानुभूती आहे. त्यामुळे त्यांना मतदारांचा पाठिंबा मिळेल. परंतु सत्तासंघर्षाच्या काळात उद्धव ठाकरेंनी घाई केली नसती तर आज परिस्थिती वेगळी असती. परंतु जर आणि तरला काहीही अर्थ नाही. मतदार ठाकरेंसोबत आहेत, असा विश्वास भूजबळांनी व्यक्त केला.

हेही वाचाः हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

दरम्यान, महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा हा निकाल सुप्रीम कोर्टाने राखून ठेवला आहे. दोन्ही बाजूचा युक्तिवाद झाला आहे. जवळजवळ 3 तास युक्तिवाद झाला. न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला आहे.

सर्वोच्च न्यायालयातील लढाईसंदर्भात भूजबळ म्हणाले की, वकील वेगवेगळे मुद्दे उपस्थित करीत आहेत. सुप्रीम कोर्टाचा निकाल काय येतो हे पाहाणं महत्त्वाचं आहे. येत्या दोन-तीन दिवसांत निकाल येईल, असं ते म्हणाले.

एसटीचे राज्य शासनामध्ये विलिनीकरण करुन घ्यावे, अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. शरद पवार यांच्या घरावही त्यामुळे हल्ला झाला. ही मागणी सरकारने गांभीर्याने घेऊन विलिनीकरण करुन घ्यावे, अशी मागणी छगन भूजबळ यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: जगातील प्रत्येक १३ पैकी एक देश अमेरिकेच्या रडारवर; ट्रम्प यांच्याकडून 'या' देशांना उद्ध्वस्त करण्याची धमकी

Latest Marathi News Live Update : नसरापूरमधील चिमुरडीवर अत्याचार; आरोपीविरुद्ध दोषारोप निश्चित, खटल्याची रोज सुनावणी होणार

Muslim Gorakshak Dal : 'गाय राष्ट्रीय पशू झालीच पाहिजे'; मिरजेत मुस्लिम गोरक्षक दलाकडून जनजागृती मोहीम, 'गांधीगिरी' करत दिला गोसंरक्षणाचा संदेश!

IPL 2026: वैभव सूर्यवंशीला Orange Cap च्या शर्यतीत ३ खेळाडू देणार टक्कर... विराट कोहली या शर्यतीतही शेवटून पहिला, किती धावांचे अंतर?

MLC Election: जागेसाठी महायुतीत चढाओढ! शिंदेंनंतर फडणवीसांची दिल्लीवारी; पीएम मोदींसोबतच्या बैठकीमागे काय?

SCROLL FOR NEXT