Jayant Patil
Jayant Patil 
महाराष्ट्र

अजित पवार आणि जयंत पाटलांमध्ये तीन तास चर्चा; मन वळविले?

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : भाजपसोबत गेलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची मनधरणी करण्याचे राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून प्रयत्न सुरुच असून, आज (रविवार) सकाळी जयंत पाटील आणि दिलीप वळसे पाटील यांनी अजित पवारांची भेट घेतली. 

देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या साथीने काल (शनिवार) मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप झाला होता. अजित पवारांनी काही आमदारांसह राजभवनात शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादीने आपला याला पाठिंबा नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर अजित पवार यांची विधिमंडळ नेतेपदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यामुळे आता त्यांच्याकडे कोणतेच अधिकार नाहीत. कालपासून अजित पवारांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरु आहेत.

आज (रविवार) सकाळी सुरवातीला दिलीप वळसे पाटील हे अजित पवारांच्या निवासस्थानी पोहचले. त्यानंतर जयंत पाटील याठिकाणी आले. सुमारे दोन तास यांच्यात चर्चा झाली. पण, अजित पवारांचे मन वळविण्यात हे नेते यशस्वी झाले की नाही याबाबत माहिती मिळू शकली नाही. अजित पवार यांच्या मनधरणीबाबतचा सस्पेन्स कायम आहे. काल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची मनधरणी केल्यानंतर आज दिलीप वळसे पाटील यांच्यासह जयंत पाटील यांनी तीन तास चर्चा केली, मनधरणी केली, या तीन तासात काय झालं याचा सस्पेन्स मात्र दोन्ही नेत्यानी ठेवला. या ठिकाणाहून हे दोन्ही नेते राष्ट्रवादीचे आमदार वास्तव्यास असलेल्या रेनसाँ हॉटेलकडे रवाना झाले. याठिकाणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आमदारांच्या भेटीला गेले आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update:"राम कृष्ण हरी," म्हणत पंतप्रधानांचे सोलापुरातील भाषण सुरू

Wagholi Crime News : अष्टविनायक महामार्गावर अपघात; तिघांचा उपचारा दरम्यान मध्यरात्री मृत्यु

Aamir Khan: इम्रान खान करणार कमबॅक,भाच्यासाठी अमिर करणार असे काही की...!

Team India squad T20 WC24 : आज हार्दिक पांड्याचा लागणार निकाल; टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची होणार घोषणा, 'ही' 9 नावे निश्चित

Lok Sabha Election: पुन्हा सूरत पॅटर्न! शेवटच्या दिवशी काँग्रेस उमेदवाराने अर्ज मागे घेत केला भाजप प्रवेश..काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT