Cyber Crime sakal
महाराष्ट्र बातम्या

कितीही सांगा, आम्ही फसणारच! सोलापुरातील ६९ वर्षीय भूसार व्यापाऱ्याला सायबर गुन्हेगारांकडून ४१ लाख रुपयाचा गंडा; ‘डिजिटल ॲरेस्ट’ केले, पत्नीही घाबरली अन्‌...

बाजार समितीत भूसार व्यापारी असलेले भुतडा यांना सायबर गुन्हेगारांनी तब्बल ४१ लाख रुपयांना गंडा घातला आहे. त्यांच्या फिर्यादीवरून या प्रकरणी शुक्रवारी (ता. ७) सोलापूर शहर सायबर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. सायबर गुन्हेगारांनी त्यांना डिजिटल अरेस्ट केली व अटकेची भीती दाखवून ही फसवणूक केली आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : बाजार समितीत भूसार व्यापारी असलेले भुतडा यांना सायबर गुन्हेगारांनी तब्बल ४१ लाख रुपयांना गंडा घातला आहे. त्यांच्या फिर्यादीवरून या प्रकरणी शुक्रवारी (ता. ७) सोलापूर शहर सायबर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. सायबर गुन्हेगारांनी त्यांना डिजिटल अरेस्ट केली व अटकेची भीती दाखवून ही फसवणूक केली आहे.

मागच्या महिन्यात अनोळखी क्रमांकावर भुतडा यांना एक कॉल आला. नरेश गोयल हा खूप मोठा फ्रॉडर असून त्याच्या खात्यातून तुमच्या बॅंक खात्यात २५ लाख रुपये ट्रान्स्फर झाल्याचे सांगितले. तुमच्या सीमकार्डवरून समोरील व्यक्तीलाही पैसे पाठविण्यात आल्याचेही सांगण्यात आले. तुम्हाला ईडी, सीबीआय व पोलिसांची नोटीस आली असून आता कधीही अटक होऊ शकते, अशी भीती दाखविली. त्याचवेळी ‘या गुन्ह्याचा तपास होईपर्यंत आम्ही तुम्हाला डिजिटल अरेस्ट करतोय’ असे सांगून त्यांना व्हिडिओ कॉल करून बसवून ठेवले.

भुतडा यांच्या मोबाईलवर त्यांच्या मुलाचा फोन येत असल्याने त्यांच्या पत्नीच्या मोबाईलवर कॉल केला. अटकेच्या भीतीने ७ ते ९ ऑक्टोबर या तीन दिवसांत भुतडा यांच्याकडून सायबर गुन्हेगारांनी ४१ लाख रुपये घेतले. सायबर गुन्हेगारांनी समोरील पाच बॅंक खात्यात ते पैसे ट्रान्स्फर केले. घाबरलेल्या ६९ वर्षीय व्यापाऱ्याने तीन दिवसांत त्यांनी स्वत:च्या कमाईची संपूर्ण रक्कम सायबर गुन्हेगारांना पाठवून दिली. बदनामी होईल म्हणून पोलिसांतही ते गेले नाहीत. २० दिवसांनी त्यांनी मित्र, नातेवाईकांचा सल्ला घेऊन सायबर पोलिसांकडे धाव घेतली. लखनौ, राजस्थान, पश्चिम बंगाल येथील ती बॅंक खाती असल्याची बाब समोर आली आहे. त्यातील एका खात्यात सध्या अवघे सात हजार रुपये आहेत. सोलापूर शहर सायबर पोलिस आता गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

डिजिटल अरेस्ट पोलिस कधीही करत नाहीत

पोलिस ज्या गुन्ह्यात आरोपीच्या अटकेची गरज आहे, त्यावेळी प्रत्यक्षात जाऊन त्याला अटक करतात. डिजिटल अरेस्ट अशी कोणतीही गोष्ट पोलिसांमध्ये नाही. त्यामुळे नागरिकांनी डिजिटल अरेस्ट करण्यासंदर्भात कोणीही बोलले तर थेट पोलिसांमध्ये जावे. घाई, अर्धवट ज्ञान (अज्ञान) व आमिष, या तीन गोष्टीतूनच सायबर गुन्हेगार नागरिकांची फसवणूक करतात. त्यामुळे प्रत्येकांनी त्या तिन्ही गोष्टींचा विचार केल्यास निश्चितपणे कोणाचीही फसवणूक होणार नाही.

- श्रीशैल गजा, वरिष्ठ पोलिस निरीक्षक (सायबर), सोलापूर शहर

व्यापाऱ्याची पत्नीही घाबरली अन्‌...

समोरील व्यक्तीने पोलिस अधिकारी बोलत असल्याचे सांगून भुतडा यांना अटकेची भीती घातली होती. त्यांच्या पत्नीला ही बाब समजली, त्यावेळी पोलिस घरी येऊन मारहाण करतील, अटक करतील म्हणून त्याही घाबरल्या होत्या. त्यामुळे त्यांनी समोरील व्यक्ती जसे म्हणतोय तसे करायला पतीला काळजीपोटी सांगितले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Metro: मेट्रो लाईन ४ च्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! पहिल्या टप्प्याचे काम डिसेंबरमध्ये सुरू होणार, कुठून कुठे असणार?

Solapur Agriculture : विहीर योजनेत सरकारचा दुटप्पीपणा,सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांना विहिरीचा थेट लाभ द्या!

Kashmir Encounter: मोठी बातमी! भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, दोघांचा खात्मा, कुठे घडली घटना?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी पचमढी येथे दाखल

Rupali Chakankar: चाकणकर-ठोंबरेंमध्ये वाद का पेटला? पक्षाने धाडलेल्या नोटिशीत नेमकं काय?

SCROLL FOR NEXT